मुंबईः सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी (chipi airport inauguration) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी त्यांच्यात रंगलेले वाकयुद्धाची महाराष्ट्रभर चर्चा होती. भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही एक ट्वीट करत या प्रकरणात उडी घेतली आहे. निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडले. यावेळी सर्वाधिक चर्चा रंगली ती नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्या भाषणांची. कार्यक्रमात उद्धव ठाकरे व नारायण राणे यांची व्यासपीठावरील आसनव्यवस्था शेजारी शेजारी होती. मात्र एकमेकांकडे बघणेही हे दोन नेते टाळत होते. भाषणातूनही या दोन्ही नेत्यांनी आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या भाषणातून राणेंना प्रत्युत्तर दिलं होतं. यावर नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचं उद्घाटन झालं. मुख्यमंत्री आले आणि गेले, डायलॉग मारायचा प्रयत्न केला पण ज्यांना भाषण जमत नाही ते डायलॉग काय मारणार. मुख्यमंत्री विकासात्मक बोलतील अशी अपेक्षा होती पण नेहमीप्रमाणे फालतू भाषण. राणे साहेबांनी व्यासपीठावरून राणेंची ताकद दाखवून दिली, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
आजचा क्षण आदळआपट करण्याचा नसून आनंदाचा आहे’, असा टोला सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी राणे यांना लगावला. सिंधुदुर्गच्या विकासात फक्त आपलेच नाव असून दुसऱ्या कुणाचे नाही या राणेंच्या वक्तव्यावर बोलताना ठाकरे यांनी, ‘शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्लाही आपणच बांधला, असा कुणीतरी दावा उद्या करेल’, असा तीर राणे यांच्या दिशेने सोडला. ‘या मातीत अनेक झाडे उगवतात त्यात काही बाभळीची असतात, तर काही आंब्याची. बाभळीची झाडे उगवली तर मातीला सोसण्याशिवाय पर्याय नाही’ असेही उद्गार त्यांनी काढले. या कार्यक्रमात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दिल्लीतून ऑनलाइन सहभागी झाले होते. त्यांनी मराठीत आपले भाषण केले. त्याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. विमानतळांबाबत ज्योतिरादित्य शिंदे तळमळीने बोलत होते. तळमळीने बोलणे वेगळे, मळमळीने बोलणे वेगळे. पाठांतर करून बोलणे वेगळे, आत्मसात करून बोलणे वेगळे, असा चिमटाही त्यांनी काढला.
सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचं उद्घाटन झालं. मुख्यमंत्री आले आणि गेले, डायलॉग मारायचा प्रयत्न केला पण ज्यांना भाषण जमत नाही ते डायलॉग काय मारणार. मुख्यमंत्री विकासात्मक बोलतील अशी अपेक्षा होती पण नेहमीप्रमाणे फालतू भाषण. राणे साहेबांनी व्यासपीठावरून राणेंची ताकद दाखवून दिली, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
आजचा क्षण आदळआपट करण्याचा नसून आनंदाचा आहे’, असा टोला सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी राणे यांना लगावला. सिंधुदुर्गच्या विकासात फक्त आपलेच नाव असून दुसऱ्या कुणाचे नाही या राणेंच्या वक्तव्यावर बोलताना ठाकरे यांनी, ‘शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्लाही आपणच बांधला, असा कुणीतरी दावा उद्या करेल’, असा तीर राणे यांच्या दिशेने सोडला. ‘या मातीत अनेक झाडे उगवतात त्यात काही बाभळीची असतात, तर काही आंब्याची. बाभळीची झाडे उगवली तर मातीला सोसण्याशिवाय पर्याय नाही’ असेही उद्गार त्यांनी काढले. या कार्यक्रमात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दिल्लीतून ऑनलाइन सहभागी झाले होते. त्यांनी मराठीत आपले भाषण केले. त्याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. विमानतळांबाबत ज्योतिरादित्य शिंदे तळमळीने बोलत होते. तळमळीने बोलणे वेगळे, मळमळीने बोलणे वेगळे. पाठांतर करून बोलणे वेगळे, आत्मसात करून बोलणे वेगळे, असा चिमटाही त्यांनी काढला.