अ‍ॅपशहर

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'गजनी': नीतेश राणे

सत्तेत असूनही विरोधकांच्या भूमिकेत वावरणाऱ्या व वेळोवेळी भूमिका बदलण्याचा आरोप होत असलेल्या शिवसेनेवर काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. नीतेश यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना 'गजनी' चित्रपटातील आमीर खानच्या व्यक्तिरेखेशी केली आहे. उद्धव हे 'महाराष्ट्राचे गजनी' आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Times 16 Jul 2017, 9:16 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nitesh rane compares uddhav with aamir khans ghajini
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 'गजनी': नीतेश राणे


सत्तेत असूनही विरोधकांच्या भूमिकेत वावरणाऱ्या व वेळोवेळी भूमिका बदलण्याचा आरोप होत असलेल्या शिवसेनेवर काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. नीतेश यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना 'गजनी' चित्रपटातील आमीर खानच्या व्यक्तिरेखेशी केली आहे. उद्धव हे 'महाराष्ट्राचे गजनी' आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

'गजनी' चित्रपटात आमीर खानला विस्मरणाचा आजार जडलेला असतो. त्यावर उपाय म्हणून आमीर खान आपल्या आयुष्यातील विविध घटना, व्यक्ती व प्रसंग शरीरावर गोंदवून ठेवत असतो. उद्धव यांचीही सध्या तशीच अवस्था असल्याचं नीतेश यांनी सूचित केलं आहे. उद्धव यांची 'गजनी'शी तुलना करणारं एक रेखाचित्रच नीतेश राणे यांनी ट्विट केलं आहे. या चित्रावर त्यांनी शिवसेनेच्या परस्परविरोधी भूमिकांचा उल्लेख केला आहे. त्यात उद्धव यांच्या ‘भाजप आमचा मित्र पक्ष आहे,’ ‘एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला विरोध,’ ‘जीएसटीला विरोध,’ ‘कर्जमाफीला विरोध,’ ‘मी सत्तेत आहे,’ आणि ‘समृद्धीला शिवसेनेचा विरोध आहे,’ या वक्तव्यांचा समावेश आहे. 'महाराष्ट्राचा गजनी' असा मथळाही या चित्राला देण्यात आलाय. नीतेश यांचं हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.
After a long time.. but Cudnt stop myself 😊 pic.twitter.com/D1syTqwEfc — nitesh rane (@NiteshNRane) July 15, 2017 याआधीही नीतेश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव यांना लक्ष्य केलं होतं. राज्यातील सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचं वक्तव्य विक्रमी वेळा केल्याबद्दल उद्धव यांची गिनीज बुकात नोंद करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. तसा अर्जच त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकार्डला केला होता.

नुकत्याच झालेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे व नारायण राणे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यांनी परस्परांचा आदरपूर्वक नामोल्लेखही केला होता. त्यामुळं राणे-ठाकरे संबंधांतील तणाव निवळेल असं वाटत असतानाच नीतेश यांनी उद्धव यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. आता या टीकेला शिवसेना काय उत्तर देते, याबद्दल उत्सुकता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज