प्लॅनेट कॅम्पस टीम
दहावीनंतर करिअर निवड ही त्यांच्या आयुष्याला वळण देणारी असते. मात्र, मुंबई आणि परिसरातील ६६ टक्के विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत शाळेमधून कोणतेही करिअर मार्गदर्शनच मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या प्लॅनेट कॅम्पस उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात हे उघड झाले.
नुकत्याच बोरीवली येथे पार पडलेल्या करिअर व्हिजनमध्ये विविध करिअर्सची माहिती घेण्यासाठी आलेल्या दोन हजार विद्यार्थी-पालकांना या सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आले. शिक्षणक्षेत्रातील सध्याच्या सहा प्रमुख प्रश्नांवर हे सर्वेक्षण घेण्यात आले.
राज्यात शिक्षण विभागाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलमापन चाचणी सुरू करण्यात आली आहे. पण त्यासाठी आवश्यक असलेले करिअर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होते का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता केवळ ३४ टक्के विद्यार्थ्यांना शाळांमधून दहावीनंतरच्या विविध करिअर्सची माहिती दिली जात असल्याचे समोर आले. उर्वरित ६६ टक्के विद्यार्थ्यांना शाळांमधून दहावीनंतर पुढे करिअरचे कोणते पर्याय आहेत, याची साधी कल्पनाही नव्हती. त्यामुळे करिअरविषयीचा गोंधळ दूर करण्यासाठी हे विद्यार्थी स्वतःहूनच प्रयत्नशील असल्याचे दिसले. ‘शाळेतूनच आम्हाला दहावीनंतरच्या पर्यायांची माहिती दिली गेली तर आवडीचे करिअर निवडण्यासाठी आम्हाला खूपच मदत होईल,’ अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा असावी का? या मुद्द्यांवरूनही विद्यार्थी-पालकांमध्ये दोन गट पडल्याचेही सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. ४७ टक्के विद्यार्थी हे वेगळ्या सीईटीच्या बाजूने आहेत. तर ५३ टक्के विद्यार्थ्यांना केवळ बारावीच्या गुणांनाच महत्त्व दिले जावे, असे वाटते.
विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून आम्ही यंदापासून विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय, लवकरच काही ठराविक शाळांना एकत्र आणून विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून करिअर मार्गदर्शक म्हणून शिक्षकांची निवड करण्याचा विचार सुरू आहे.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री
दहावीनंतर करिअर निवड ही त्यांच्या आयुष्याला वळण देणारी असते. मात्र, मुंबई आणि परिसरातील ६६ टक्के विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत शाळेमधून कोणतेही करिअर मार्गदर्शनच मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या प्लॅनेट कॅम्पस उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात हे उघड झाले.
नुकत्याच बोरीवली येथे पार पडलेल्या करिअर व्हिजनमध्ये विविध करिअर्सची माहिती घेण्यासाठी आलेल्या दोन हजार विद्यार्थी-पालकांना या सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यात आले. शिक्षणक्षेत्रातील सध्याच्या सहा प्रमुख प्रश्नांवर हे सर्वेक्षण घेण्यात आले.
राज्यात शिक्षण विभागाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलमापन चाचणी सुरू करण्यात आली आहे. पण त्यासाठी आवश्यक असलेले करिअर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होते का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता केवळ ३४ टक्के विद्यार्थ्यांना शाळांमधून दहावीनंतरच्या विविध करिअर्सची माहिती दिली जात असल्याचे समोर आले. उर्वरित ६६ टक्के विद्यार्थ्यांना शाळांमधून दहावीनंतर पुढे करिअरचे कोणते पर्याय आहेत, याची साधी कल्पनाही नव्हती. त्यामुळे करिअरविषयीचा गोंधळ दूर करण्यासाठी हे विद्यार्थी स्वतःहूनच प्रयत्नशील असल्याचे दिसले. ‘शाळेतूनच आम्हाला दहावीनंतरच्या पर्यायांची माहिती दिली गेली तर आवडीचे करिअर निवडण्यासाठी आम्हाला खूपच मदत होईल,’ अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा असावी का? या मुद्द्यांवरूनही विद्यार्थी-पालकांमध्ये दोन गट पडल्याचेही सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. ४७ टक्के विद्यार्थी हे वेगळ्या सीईटीच्या बाजूने आहेत. तर ५३ टक्के विद्यार्थ्यांना केवळ बारावीच्या गुणांनाच महत्त्व दिले जावे, असे वाटते.
विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून आम्ही यंदापासून विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय, लवकरच काही ठराविक शाळांना एकत्र आणून विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून करिअर मार्गदर्शक म्हणून शिक्षकांची निवड करण्याचा विचार सुरू आहे.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री