म. टा. प्रतिनिधी, मुंबई
विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढीस लागावी, यासाठी यंदाही ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्याची सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिली आहे. मात्र जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन करावे, याबाबतचे परिपत्रक काही कॉलेजांना उशिराने पाठविण्यात आल्याने राज्यातील काही ज्युनिअर कॉलेजांचे विद्यार्थी या ग्रंथ महोत्सवापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बोर्डाच्या आणि कॉलेजांच्या परीक्षाही होत असताना, ग्रंथमहोत्सवाची अवघड परीक्षा राज्यभरातील शाळा आणि कॉलेजांना द्यावी लागणर आहे.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव साजरा करावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. मागील आघाडी सरकारने वाचनसंस्कृतीचा विकास व्हावा, यासाठी राज्यातील प्रमुख जिल्ह्यांच्या ठिकाणी डिसेंबर ते जानेवारी महिन्याच्या कालावधीत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या सरकारने आता फेब्रुवारीही संपत आला असताना, जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात राज्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यास मान्यता देत कॉलेजांना याबाबत पत्रक पाठविले आहे. त्यातच परीक्षा असल्याने बारावीपासून ते पदवीपर्यंतचे तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या ग्रंथोत्सवाकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
खर्चाबाबतही संभ्रम
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यासाठी परिपत्रक काढताना ग्रंथोत्सवासाठी नेमका किती निधी खर्च केला जावा, याबाबत कोणतीही नियमावली स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे कॉलेजांच्या संभ्रमावस्थेत आणखीन भर पडली आहे.
परीक्षा की ग्रंथोत्सव?
फेब्रुवारी महिना संपत आला असताना, राज्य सरकारने सूचना केलेल्या ग्रंथोत्सवाला केवळ कॉलेजातीलच नव्हे, तर शालेय विद्यार्थीही मुकणार आहेत. हे महोत्सव जानेवारी महिन्यापर्यंत झाले पाहिजेत, मात्र सरकारला वाचनसंस्कृती, मराठी शाळा, मराठी भाषा याविषयी अनास्था असल्याचे या उशिरा काढण्यात आलेल्या परिपत्रकावरून दिसून येते, असा आरोप एमफुक्टो संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब साळवे यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढीस लागावी, यासाठी यंदाही ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्याची सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिली आहे. मात्र जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन करावे, याबाबतचे परिपत्रक काही कॉलेजांना उशिराने पाठविण्यात आल्याने राज्यातील काही ज्युनिअर कॉलेजांचे विद्यार्थी या ग्रंथ महोत्सवापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बोर्डाच्या आणि कॉलेजांच्या परीक्षाही होत असताना, ग्रंथमहोत्सवाची अवघड परीक्षा राज्यभरातील शाळा आणि कॉलेजांना द्यावी लागणर आहे.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव साजरा करावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत. मागील आघाडी सरकारने वाचनसंस्कृतीचा विकास व्हावा, यासाठी राज्यातील प्रमुख जिल्ह्यांच्या ठिकाणी डिसेंबर ते जानेवारी महिन्याच्या कालावधीत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या सरकारने आता फेब्रुवारीही संपत आला असताना, जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात राज्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यास मान्यता देत कॉलेजांना याबाबत पत्रक पाठविले आहे. त्यातच परीक्षा असल्याने बारावीपासून ते पदवीपर्यंतचे तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या ग्रंथोत्सवाकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
खर्चाबाबतही संभ्रम
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यासाठी परिपत्रक काढताना ग्रंथोत्सवासाठी नेमका किती निधी खर्च केला जावा, याबाबत कोणतीही नियमावली स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे कॉलेजांच्या संभ्रमावस्थेत आणखीन भर पडली आहे.
परीक्षा की ग्रंथोत्सव?
फेब्रुवारी महिना संपत आला असताना, राज्य सरकारने सूचना केलेल्या ग्रंथोत्सवाला केवळ कॉलेजातीलच नव्हे, तर शालेय विद्यार्थीही मुकणार आहेत. हे महोत्सव जानेवारी महिन्यापर्यंत झाले पाहिजेत, मात्र सरकारला वाचनसंस्कृती, मराठी शाळा, मराठी भाषा याविषयी अनास्था असल्याचे या उशिरा काढण्यात आलेल्या परिपत्रकावरून दिसून येते, असा आरोप एमफुक्टो संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब साळवे यांनी केला आहे.