मुंबई: मुंबईत बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना आता विलगीकरणाची (क्वारंटाइन) गरज नाही. तसंच हातावरचा स्टॅम्पसुद्धा निघाला आहे. विमानतळ असो वा रेल्वे स्टेशन किंवा रस्तामार्गे येणारे प्रवासी असोत, कोणालाही विलगीकरणाची गरज नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ( Maharashtra Quarantine Rules Latest Updates )
वाचा: सिनेमागृहांचा उद्याचा मुहूर्त टळला!; मुख्यमंत्र्यांनी केली महत्त्वाची सूचना
विलगीकरणाची गरज नसली तरी प्रत्येकाने करोना सुरक्षेसंबंधीचा शिष्टाचार पाळणं बंधनकारक असेल, असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशांतर्गत कुठल्याही शहरातून दाखल होणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने राज्यातील सर्व शहरांमधील रेल्वे स्टेशन व विमानतळांसाठीही हा निर्णय घेतला आहे.
वाचा: मुंबईत 'अनलॉक'चा धडाका; आता 'ही' सेवा रविवारपासून सुरू होणार
राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू आहे. मिशन बिगिन अंतर्गत राज्य सरकार अनेक निर्बंध शिथील करत आहे. त्याचा भाग म्हणून विमान, रेल्वे आणि रस्तेमार्गे येणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मुंबईत विमानाने येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक होते. या क्वारंटाइनच्या अटीमुळे प्रवाशांची मोठी कोंडी होत होती. आता क्वारंटाइनची अट शिथील करण्यात आल्याने सर्वच प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
वाचा: Unlock 5: मुंबई मेट्रोला हिरवा कंदील; ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय
दरम्यान, राज्य सरकारने अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात सर्वप्रथम हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिली. ५० टक्के क्षमतेने मार्गदर्शक तत्वे पाळून ग्राहकसेवा द्यावी, असे सरकारने स्पष्ट केले. त्यानंतर बुधवारी सरकारने आणखी काही निर्णय घेतले. त्यात मुंबई मेट्रो आणि मोनो रेलसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. यापैकी मोनो रेल रविवार दि. १८ ऑक्टोबरपासून धावणार आहे तर मेट्रो सेवा सोमवार दि. १९ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील सर्व खासगी आणि शासकीय ग्रंथालये सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. राज्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात सर्वच शहरांत आठवडे बाजार भरतात. या बाजारांनाही अनुमती देण्यात आली आहे. त्यासोबत जनावरांच्या बाजारांनाही परवानगी मिळाली आहे. या निर्णयांनंतर आता विमान आणि रेल्वे प्रवाशांची क्वारंटाइनच्या कचाट्यातून सुटका करण्यात आल्याने तो खूप मोठा दिलासा ठरला आहे.
वाचा: करोनाला रोखणे सहज शक्य!; CM ठाकरेंनी दिला 'हा' मोलाचा सल्ला
वाचा: सिनेमागृहांचा उद्याचा मुहूर्त टळला!; मुख्यमंत्र्यांनी केली महत्त्वाची सूचना
विलगीकरणाची गरज नसली तरी प्रत्येकाने करोना सुरक्षेसंबंधीचा शिष्टाचार पाळणं बंधनकारक असेल, असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशांतर्गत कुठल्याही शहरातून दाखल होणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने राज्यातील सर्व शहरांमधील रेल्वे स्टेशन व विमानतळांसाठीही हा निर्णय घेतला आहे.
वाचा: मुंबईत 'अनलॉक'चा धडाका; आता 'ही' सेवा रविवारपासून सुरू होणार
राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू आहे. मिशन बिगिन अंतर्गत राज्य सरकार अनेक निर्बंध शिथील करत आहे. त्याचा भाग म्हणून विमान, रेल्वे आणि रस्तेमार्गे येणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या मुंबईत विमानाने येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक होते. या क्वारंटाइनच्या अटीमुळे प्रवाशांची मोठी कोंडी होत होती. आता क्वारंटाइनची अट शिथील करण्यात आल्याने सर्वच प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
वाचा: Unlock 5: मुंबई मेट्रोला हिरवा कंदील; ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय
दरम्यान, राज्य सरकारने अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात सर्वप्रथम हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिली. ५० टक्के क्षमतेने मार्गदर्शक तत्वे पाळून ग्राहकसेवा द्यावी, असे सरकारने स्पष्ट केले. त्यानंतर बुधवारी सरकारने आणखी काही निर्णय घेतले. त्यात मुंबई मेट्रो आणि मोनो रेलसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. यापैकी मोनो रेल रविवार दि. १८ ऑक्टोबरपासून धावणार आहे तर मेट्रो सेवा सोमवार दि. १९ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील सर्व खासगी आणि शासकीय ग्रंथालये सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. राज्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात सर्वच शहरांत आठवडे बाजार भरतात. या बाजारांनाही अनुमती देण्यात आली आहे. त्यासोबत जनावरांच्या बाजारांनाही परवानगी मिळाली आहे. या निर्णयांनंतर आता विमान आणि रेल्वे प्रवाशांची क्वारंटाइनच्या कचाट्यातून सुटका करण्यात आल्याने तो खूप मोठा दिलासा ठरला आहे.
वाचा: करोनाला रोखणे सहज शक्य!; CM ठाकरेंनी दिला 'हा' मोलाचा सल्ला