मुंबई: चेंबूर येथील आरके स्टुडिओच्या मागे असलेल्या बोर्ला व्हिलेजमधील (सीटीएस क्रमांक ६७६) भूखंडावर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण करण्यात आलेलं नाही. हा भूखंड आरक्षित नसल्याने तो बळकावण्याचा प्रश्नच येत नसल्याचा खुलासा या भूखंडाचे मालक अवतारसिंग आलाग यांनी केला आहे.
आवतार सिंग आलाग हे उद्योजक असून चेंबूर येथे राहतात. हा भूखंड त्यांच्या मालकीचा आहे. राज्य सरकारने हा भूखंड डीपी प्लान २०३४ अंतर्गत खेळाचे मैदान, कामगार महिलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित ठेवला आहे. असे असतानाही आरक्षण धाब्यावर बसवून या जागेत अवतारसिंग आलाग या व्यक्तीने बार सुरू केला आहे, असा थेट आरोप यासीन ताहेर शरीफ यांनी केला होता. तसं वृत्तही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. मात्र अवतार सिंग आलाग यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. हे वृत्त तथ्यहीन आणि निराधार असल्याचं आलाग यांनी म्हटलं आहे. तसेच या भूखंडाबाबत महापालिकेनेही कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचं आलाग यांनी स्पष्ट केलं आहे. केवळ रस्ता रुंदीकरणासाठी आमच्या भूखंडाचा काही भाग पालिकेने घेतला होता, त्याची माहिती पालिकेने आम्हाला दिली होती. याबाबत मी सीटी सर्व्हे कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यानंतर सीटी सर्व्हे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी येऊन जागेचं मोजमाप केलं होतं, असंही त्यांनी नमूद केलं. या प्रकरणी एका व्यक्तिने सीटी सर्व्हे कार्यालयाची दिशाभूल करणारी खोटी तक्रार दाखल केली होती. वस्तुस्थिती लपवण्यासाठी आणि बदनामी करण्यासाठीच ही तक्रार करण्यात आली होती, असंही त्यांनी म्हटलं आहे.
धार्मिक तेढ नाही
या परिसरात बारच्या बाजूला मशीद असून या ठिकाणी गडबड होऊन धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद इक्बाल कन्नान यांनी वर्तविली होती. त्यालाही आलाग यांनी आक्षेप घेतला आहे. या परिसरात असा कोणताही प्रकार होण्याची शक्यता नाही. मशीद आणि सदरील भूखंड या दरम्यान मोठं अंतर असून ते आपण पाहू शकता, असं सांगतानाच या परिसरात धार्मिक तेढ निर्माण होण्याचं वृत्त तथ्यहीन असल्याचंही आलाग यांनी स्पष्ट केलं आहे.
आवतार सिंग आलाग हे उद्योजक असून चेंबूर येथे राहतात. हा भूखंड त्यांच्या मालकीचा आहे. राज्य सरकारने हा भूखंड डीपी प्लान २०३४ अंतर्गत खेळाचे मैदान, कामगार महिलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित ठेवला आहे. असे असतानाही आरक्षण धाब्यावर बसवून या जागेत अवतारसिंग आलाग या व्यक्तीने बार सुरू केला आहे, असा थेट आरोप यासीन ताहेर शरीफ यांनी केला होता. तसं वृत्तही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. मात्र अवतार सिंग आलाग यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. हे वृत्त तथ्यहीन आणि निराधार असल्याचं आलाग यांनी म्हटलं आहे. तसेच या भूखंडाबाबत महापालिकेनेही कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचं आलाग यांनी स्पष्ट केलं आहे. केवळ रस्ता रुंदीकरणासाठी आमच्या भूखंडाचा काही भाग पालिकेने घेतला होता, त्याची माहिती पालिकेने आम्हाला दिली होती. याबाबत मी सीटी सर्व्हे कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यानंतर सीटी सर्व्हे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी येऊन जागेचं मोजमाप केलं होतं, असंही त्यांनी नमूद केलं. या प्रकरणी एका व्यक्तिने सीटी सर्व्हे कार्यालयाची दिशाभूल करणारी खोटी तक्रार दाखल केली होती. वस्तुस्थिती लपवण्यासाठी आणि बदनामी करण्यासाठीच ही तक्रार करण्यात आली होती, असंही त्यांनी म्हटलं आहे.
धार्मिक तेढ नाही
या परिसरात बारच्या बाजूला मशीद असून या ठिकाणी गडबड होऊन धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद इक्बाल कन्नान यांनी वर्तविली होती. त्यालाही आलाग यांनी आक्षेप घेतला आहे. या परिसरात असा कोणताही प्रकार होण्याची शक्यता नाही. मशीद आणि सदरील भूखंड या दरम्यान मोठं अंतर असून ते आपण पाहू शकता, असं सांगतानाच या परिसरात धार्मिक तेढ निर्माण होण्याचं वृत्त तथ्यहीन असल्याचंही आलाग यांनी स्पष्ट केलं आहे.