अ‍ॅपशहर

मुंबईकरांचा आवाज बसला

उष्म्यामध्ये वाढ झाल्यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वेगाने वाढले आहे. सर्दी, डोकेदुखी यांसह संसर्गजन्य ताप आणि घसादुखी, खोकल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. घसादुखी आणि खोकल्यामुळे आवाज बसल्याच्या, बोलताना, अन्न गिळताना वेदना होत असल्याच्या तक्रारी खासगी व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये रुग्णांनी सांगितल्या आहेत.

Maharashtra Times 14 Mar 2018, 2:48 am
- हवामानातील बदल संसर्गासाठी कारणीभूत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no of climate change infectious disease increasing
मुंबईकरांचा आवाज बसला


- संसर्गजन्य आजारांच्या तक्रारी दुपटीने वाढल्या

- महिला व लहान मुलांना सर्वाधिक त्रास

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

उष्म्यामध्ये वाढ झाल्यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वेगाने वाढले आहे. सर्दी, डोकेदुखी यांसह संसर्गजन्य ताप आणि घसादुखी, खोकल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. घसादुखी आणि खोकल्यामुळे आवाज बसल्याच्या, बोलताना, अन्न गिळताना वेदना होत असल्याच्या तक्रारी खासगी व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये रुग्णांनी सांगितल्या आहेत.

फिजिशिअन डॉ. हेमंत वर्तक यांनी हवामानामध्ये सातत्याने होणारे बदल घसादुखीच्या संसर्गासाठी कारणीभूत असतात. ताप नसेल तर घसादुखी, खोकला याकडे दुर्लक्ष केले जाते. पण सातत्याने होत असलेल्या घसादुखीचा ताण स्वरयंत्रावर पडून घशाच्या मागील पटलही लाल होते. त्यामुळे वेळीच संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी घसादुखीची नेमकी कारणे समजून घेण्याची गरज आहे. स्वरयंत्रावर ताण आला की आवाज बसतो, वा तो सुटत नाही. मीठ टाकून गरम पाण्याच्या गुळण्या केल्याने, गरम दूधामध्ये हळद घालून प्यायल्याने हा त्रास काही अंशी कमी होतो, पण घरगुती उपायांपेक्षा संसर्गजन्य आजारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, याकडे ते लक्ष वेधतात.

कारणांचा शोध घ्या

पावसाळ्याच्या वा हिवाळ्याच्या सुरुवातीला संसर्गजन्य आजारांच्या तक्रारींचे प्रमाण वाढते. घसादुखी, खोकला, सर्दी, सतत शिंका येण्याच्या तक्रारी उन्हाळा सुरू होण्याच्या आधी गेल्या वर्षापेक्षा दुपटीने वाढल्या आहेत. महिला व लहान मुलांमध्ये या तक्रारी अधिक दिसतात, असे निरीक्षण डॉ. कैलास गमरे यांनी नोंदवले. अलर्जिक ऱ्हायनायटिस हे घसादुखीच्या संसर्गाचे एक प्रमुख कारण दिसून येते. यात टॉन्सिल्सच्या गाठी सुजतात, त्यावर काही विशिष्ट रंगाचे ठिपकेही दिसून येतात. संसर्गामुळे झालेल्या घसादुखीवर स्वतःच वेगवेगळ्या प्रकारचे उपचार रुग्ण करतात. त्यामुळे घसादुखी व खोकला बळावतो. खोकला नेमका कोणत्या कारणांमुळे आहे, हे तपासून पाहायला हवे, याकडे डॉक्टर लक्ष वेधतात. हवामानातील बदल, उष्मा, धूळ तसेच प्रदूषणाच्या संसर्गामुळेही खोकला वाढतो असे दिसून येत आहे.

कान दुखतोय? दुर्लक्ष करू नका

घसा दुखण्यापूर्वी घसा खवखवणे, घशात खूप वेदना होणे या तक्रारी रुग्णांना जाणवतात. घसा दुखू लागला की, कान दुखण्याची तक्रारही केली जाते. काहीजणांना घशाच्या एकाच बाजूला दुखते, त्यामुळे गिळताना वा जांभई देताना खूप त्रास होतो. ही वेदना कानापर्यंत जाते, त्यातून घशात सूजही येऊ शकते. या प्रकारच्या घशाच्या दुखण्यांमध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, असे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. राहुल साळुंके यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज