अ‍ॅपशहर

नोटाबंदी निर्णय चुकीचाच

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘सिटिझन रिपोर्टर’ना त्यांचे अनुभव पाठवण्याचे आवाहन केले होते. यानुसार मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय तितकासा सर्वसामान्यांच्या पथ्यावर पडला नसल्याचा सूर त्यांनी मांडलेल्या मतांतून उमटला.

Maharashtra Times 8 Nov 2017, 4:00 am
नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘सिटिझन रिपोर्टर’ना त्यांचे अनुभव पाठवण्याचे आवाहन केले होते. यानुसार मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय तितकासा सर्वसामान्यांच्या पथ्यावर पडला नसल्याचा सूर त्यांनी मांडलेल्या मतांतून उमटला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nomination decision is wrong
नोटाबंदी निर्णय चुकीचाच


नोटाबंदी निर्णय चुकीचाच

कुलाबा : नोटाबंदीच्या निर्णयाने बसलेल्या फटक्यातून अद्याप देश सावरलेला नाही. पैसे काढण्यासाठी बँकेच्या रांगेत झालेले शेकडो मृत्यू, नागरिकांनी गमावलेला रोजगार, आर्थिक विकासाचा वेग मंदावल्यामुळे झालेल्या देशाचे प्रचंड नुकसान अशी नोटाबंदीने ओढवलेल्या संकटांची कितीतरी उदाहरणे देता येतील. नोटबंदी पूर्णत: फसली आहे. कारण सर्व पैसा बँकेत परत आला आहे.

– संतोष पवार

त्रास सहन करावा लागला

गोरेगाव : केंद्र सरकारद्वारे मागील वर्षी आर्थिक घडामोडीत अचानक नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मोठमोठ्या उद्योगधंद्यापासून ते छोटे दुकानदार, शेतकरी, नागरिक या सगळ्यांनाच फटका बसला. शेती क्षेत्र, उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्र या सर्वांवर नोटबंदीचे परिणाम झाला. अचानक ५०० व १०००च्या नोटा स्वीकारण्याचे बंद झाले. नव्या नोटांअभावी रोजची खरेदी, रेशन भरणे मुश्किल झाले होते.

- सुजय निंबारे

तो अनुभव न विसरण्यासारखा

मुलुंड : गेल्यावर्षी नोटाबंदीच्या काळात आम्ही खासगी यात्रा कंपनीबरोबर केरळला गेलो होते. ८ नोव्हेंबरला संध्याकाळी हॉटेलमध्ये जेवत असतानाच आम्हाला नोटाबंदीचा निर्णय समजला. त्यावेळी माझ्यासह अनेकांकडे ५०० व १,०००च्या नोटा होत्या.

ज्या हॉटेलमध्ये जेवत होतो, त्या हॉटेलवाल्यानेदेखील त्या नोटा घेण्यास मनाई केली. त्यावेळी आम्ही शोधून

आमच्याकडील १०० रुपयांच्या नोट्यांनी बिल भरले.

– शिवाजी सोनावणे

आजही बसतो फटका

मुंबई : नोटाबंदी ज्या उद्देशाने जाहीर केली, तो साध्य झाला की नाही हे अजून न उलगडलेले कोडे आहे. मात्र आजही या निर्णयाचा फटका बऱ्याच वेळा बसतो. एटीएममधून दोन हजारांची नोट येते. त्यामुळे सुट्यांची चणचण जाणविते. अनेकदा दुकानदारांकडून ही नोट घेण्यास टाळाटाळ केली जाते. मुळात काळा पैसा थांबविण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तशाप्रकारचे काहीही झालेले दिसत नाही.

– प्रकाश कदम

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज