अ‍ॅपशहर

'...तोपर्यंत मीच राज्याचा मुख्यमंत्री'

दिल्लीहून बोलावत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्रिपदी मीच राहणार आहे आणि रावसाहेब दानवे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उलटसुलट चर्चांवर पडदा पाडला.

Maharashtra Times 17 Aug 2017, 5:59 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम not going to centre till party leaders ask me to come cm fadnavis
'...तोपर्यंत मीच राज्याचा मुख्यमंत्री'


दिल्लीहून बोलावत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्रिपदी मीच राहणार आहे आणि रावसाहेब दानवे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उलटसुलट चर्चांवर पडदा पाडला.

देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बढती मिळू शकते, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दोघंही खुश असल्यानं त्यांना दिल्लीचं बोलावणं येऊ शकतं, असं बोललं जातंय. दुसरीकडे, वादग्रस्त विधानांमुळे सरकारच्या अडचणी वाढवणाऱ्या रावसाहेब दानवेंना पर्याय शोधण्याची तयारी श्रेष्ठी करत असल्याचंही समजतंय.

परंतु, माझं आणि दानवेंचं पद पक्कं आहे, आम्ही कुठेही जाणार नाही, असं ठामपणे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना, मी केंद्रात जाण्याची तूर्तास शक्यता नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यासोबतच, दानवेंच्या नेतृत्वात आम्ही भविष्यातही निवडणुका लढवू, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांचीही पाठराखण केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज