मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
दिल्लीहून बोलावत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्रिपदी मीच राहणार आहे आणि रावसाहेब दानवे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उलटसुलट चर्चांवर पडदा पाडला.
देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बढती मिळू शकते, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दोघंही खुश असल्यानं त्यांना दिल्लीचं बोलावणं येऊ शकतं, असं बोललं जातंय. दुसरीकडे, वादग्रस्त विधानांमुळे सरकारच्या अडचणी वाढवणाऱ्या रावसाहेब दानवेंना पर्याय शोधण्याची तयारी श्रेष्ठी करत असल्याचंही समजतंय.
परंतु, माझं आणि दानवेंचं पद पक्कं आहे, आम्ही कुठेही जाणार नाही, असं ठामपणे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना, मी केंद्रात जाण्याची तूर्तास शक्यता नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यासोबतच, दानवेंच्या नेतृत्वात आम्ही भविष्यातही निवडणुका लढवू, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांचीही पाठराखण केली.
दिल्लीहून बोलावत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्रिपदी मीच राहणार आहे आणि रावसाहेब दानवे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उलटसुलट चर्चांवर पडदा पाडला.
देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बढती मिळू शकते, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दोघंही खुश असल्यानं त्यांना दिल्लीचं बोलावणं येऊ शकतं, असं बोललं जातंय. दुसरीकडे, वादग्रस्त विधानांमुळे सरकारच्या अडचणी वाढवणाऱ्या रावसाहेब दानवेंना पर्याय शोधण्याची तयारी श्रेष्ठी करत असल्याचंही समजतंय.
परंतु, माझं आणि दानवेंचं पद पक्कं आहे, आम्ही कुठेही जाणार नाही, असं ठामपणे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना, मी केंद्रात जाण्याची तूर्तास शक्यता नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यासोबतच, दानवेंच्या नेतृत्वात आम्ही भविष्यातही निवडणुका लढवू, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांचीही पाठराखण केली.