म. टा. प्रतिनिधी, मुंबई
शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी महापरिनिर्वाण दिनानिमित्त हार, मेणबत्त्यांऐवजी एक वही, एक पेन मोहीम राबवण्याचा संकल्प ‘फेसबूक आंबेडकराइट मूव्हमेंट’ने केला आहे. त्यासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना त्यांनी पुतळ्यासमोर हार आणि मेणबत्त्या पेटवून अभिवादन करण्याऐवजी शिक्षणाचे साहित्य देऊन शिक्षणपासून दर असलेल्या मुलांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळाल्याने यंदाही ती राबवण्यात येणार आहे.
दरवर्षी चैत्यभूमी तसेच भारताच्या कानाकोपऱ्यात बाबासाहेबांचे अनुयायी हार-फुले वाहून, मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहतात. ही हार-फुले दुसऱ्या दिवशी कचरा म्हणून वाया जातात. ही आर्थिक व पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक बाब होती. तसेच यातून दैवतीकरण आणि व्यक्तिपूजेकडे जाणारी परंपरा तयार होण्याची शक्यता होती. बाबासाहेबांना व्यक्तिपूजा अमान्य होती. त्यामुळे अभिवादनाचा अभिनव मार्ग फेसबुककरांनी शोधून काढल्याचे या मोहिमेच्या कार्यकर्त्यांतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
विद्यार्थी गळतीचे प्रमाण, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे साहित्य न मिळणे, शैक्षणिक सुविधांची वाणवा हे चित्र बदलण्यासाठी या मोहिमेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांनी वही व पेन दिल्यास हे साहित्य प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. ५ व ६ डिसेंबरल शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ हे साहित्य जमा करता येईल. चैत्यभूमीपर्यंत न येणाऱ्या अनुयायांनी अशाच पद्धतीने आपल्या गावात, परिसरात ही मोहीम राबवून याचे चळवळीत रूपांतर करावे, असेही आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : दत्ता जावळे – ९७०२९२९३५६ सुधीर भालेराव – ९९३०८४५६०२ किंवा https://www.facebook.com/groups/187505067993533
शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी महापरिनिर्वाण दिनानिमित्त हार, मेणबत्त्यांऐवजी एक वही, एक पेन मोहीम राबवण्याचा संकल्प ‘फेसबूक आंबेडकराइट मूव्हमेंट’ने केला आहे. त्यासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना त्यांनी पुतळ्यासमोर हार आणि मेणबत्त्या पेटवून अभिवादन करण्याऐवजी शिक्षणाचे साहित्य देऊन शिक्षणपासून दर असलेल्या मुलांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळाल्याने यंदाही ती राबवण्यात येणार आहे.
दरवर्षी चैत्यभूमी तसेच भारताच्या कानाकोपऱ्यात बाबासाहेबांचे अनुयायी हार-फुले वाहून, मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहतात. ही हार-फुले दुसऱ्या दिवशी कचरा म्हणून वाया जातात. ही आर्थिक व पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक बाब होती. तसेच यातून दैवतीकरण आणि व्यक्तिपूजेकडे जाणारी परंपरा तयार होण्याची शक्यता होती. बाबासाहेबांना व्यक्तिपूजा अमान्य होती. त्यामुळे अभिवादनाचा अभिनव मार्ग फेसबुककरांनी शोधून काढल्याचे या मोहिमेच्या कार्यकर्त्यांतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
विद्यार्थी गळतीचे प्रमाण, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे साहित्य न मिळणे, शैक्षणिक सुविधांची वाणवा हे चित्र बदलण्यासाठी या मोहिमेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांनी वही व पेन दिल्यास हे साहित्य प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. ५ व ६ डिसेंबरल शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ हे साहित्य जमा करता येईल. चैत्यभूमीपर्यंत न येणाऱ्या अनुयायांनी अशाच पद्धतीने आपल्या गावात, परिसरात ही मोहीम राबवून याचे चळवळीत रूपांतर करावे, असेही आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : दत्ता जावळे – ९७०२९२९३५६ सुधीर भालेराव – ९९३०८४५६०२ किंवा https://www.facebook.com/groups/187505067993533