म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
'आमच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केलेले असूनही पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात येत नाही,' असा आरोप करत पंचराम रिठाडिया यांनी आत्महत्या केल्याच्या चेंबूर ठक्कर बाप्पा कॉलनीतील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने कुर्ला नेहरू नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना तसेच मुंबई पोलिस आयुक्तांना नुकतीच नोटीस जारी केली आहे. तसेच यासंदर्भात २ डिसेंबरपर्यंत उत्तर मागितले आहे.
पंचराम रिठाडिया यांच्या पत्नी मंजूदेवी रिठाडिया यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत फौजदारी रिट याचिका केली आहे. त्याविषयी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. बी. सूर्यवंशी यांच्या खंडपीठासमोर नुकतीच प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी, पंचराम यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा पुरावा असल्यास याचिकेसोबत जोडावा, असे खंडपीठाने अॅड. सातपुते यांना सांगितले. त्याचवेळी नेहरू नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास शिंदे यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व पोलिस आयुक्तांना खंडपीठाने नोटीस जारी करून त्यांना २ डिसेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले.
काय आहे आरोप?
चेंबूरमधील ठक्कर बाप्पा कॉलनीत कुटुंबासह राहणारे पंचराम रिठाडिया हे पत्नी आणि तीन मुली व एका मुलासह राहत होते. त्यांची १७ वर्षांची मुलगी आरती ही ३० मार्चपासून बेपत्ता आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर परिसरात राहणाऱ्या भागचंद फुलवारिया याने २ एप्रिलला फोन करून आरती माझ्यासोबत असून ती सुरक्षित असल्याचे त्याने आरतीची आई मंजूदेवी यांना कळवले. भागचंदने आरतीचे अपहरण केले असल्याने तिचा शोध घ्यावा, अशी तक्रार पंचराम यांनी दिली. अनेक महिने होऊनही पोलिस काहीच करत नाहीत, हे पाहून निराशाच्या गर्तेत गेलेले पंचराम यांनी आत्महत्या केली, असा आरोप आहे. या घटनेनंतर या परिसरात स्थानिकांकडून तीव्र आंदोलनही झाले होते.
कुटुंबीयांची न्यायालयाला विनंती
-आरतीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून निष्पक्ष तपास केला जात नाही आणि आरोपींना पाठिशी घातले जात असल्याने तपास राज्य सीआयडीकडे द्यावा
-तपास कामात हलगर्जी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश द्यावेत
-आरतीचा शोध घेऊन तिला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश तपास यंत्रणेला द्यावेत
'आमच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केलेले असूनही पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात येत नाही,' असा आरोप करत पंचराम रिठाडिया यांनी आत्महत्या केल्याच्या चेंबूर ठक्कर बाप्पा कॉलनीतील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने कुर्ला नेहरू नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना तसेच मुंबई पोलिस आयुक्तांना नुकतीच नोटीस जारी केली आहे. तसेच यासंदर्भात २ डिसेंबरपर्यंत उत्तर मागितले आहे.
पंचराम रिठाडिया यांच्या पत्नी मंजूदेवी रिठाडिया यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत फौजदारी रिट याचिका केली आहे. त्याविषयी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. बी. सूर्यवंशी यांच्या खंडपीठासमोर नुकतीच प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी, पंचराम यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा पुरावा असल्यास याचिकेसोबत जोडावा, असे खंडपीठाने अॅड. सातपुते यांना सांगितले. त्याचवेळी नेहरू नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास शिंदे यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व पोलिस आयुक्तांना खंडपीठाने नोटीस जारी करून त्यांना २ डिसेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले.
काय आहे आरोप?
चेंबूरमधील ठक्कर बाप्पा कॉलनीत कुटुंबासह राहणारे पंचराम रिठाडिया हे पत्नी आणि तीन मुली व एका मुलासह राहत होते. त्यांची १७ वर्षांची मुलगी आरती ही ३० मार्चपासून बेपत्ता आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर परिसरात राहणाऱ्या भागचंद फुलवारिया याने २ एप्रिलला फोन करून आरती माझ्यासोबत असून ती सुरक्षित असल्याचे त्याने आरतीची आई मंजूदेवी यांना कळवले. भागचंदने आरतीचे अपहरण केले असल्याने तिचा शोध घ्यावा, अशी तक्रार पंचराम यांनी दिली. अनेक महिने होऊनही पोलिस काहीच करत नाहीत, हे पाहून निराशाच्या गर्तेत गेलेले पंचराम यांनी आत्महत्या केली, असा आरोप आहे. या घटनेनंतर या परिसरात स्थानिकांकडून तीव्र आंदोलनही झाले होते.
कुटुंबीयांची न्यायालयाला विनंती
-आरतीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून निष्पक्ष तपास केला जात नाही आणि आरोपींना पाठिशी घातले जात असल्याने तपास राज्य सीआयडीकडे द्यावा
-तपास कामात हलगर्जी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश द्यावेत
-आरतीचा शोध घेऊन तिला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश तपास यंत्रणेला द्यावेत