मुंबई : थकीत बिलामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या खंडीत करणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदनाद्वारे केली. 'थकबाकीपोटी राज्यातील शेतकरी ग्रामपंचायतींकडे १७ हजार कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाने सूचना केली होती. मात्र शेतकरी बांधवांची मागणी पाहता ही वसुली मोहीम स्थगित करण्यात येत आहे. ग्रामपंचायतींची विजबिले राज्य शासनाने भरण्याचा निर्णय घेतला आहे. विज बिल न भरलेल्या शेतकऱ्यांची जोडणी खंडीत केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
'शेतकऱ्यांची वीज कापणार नाही'
थकीत बिलामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या खंडीत करणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदनाद्वारे केली...
Maharashtra Times 23 Mar 2018, 2:57 am