अ‍ॅपशहर

'मोदी-ट्रम्प दोस्तीचे दुष्परिणाम आता भारताला भोगावे लागणार'

अध्यक्षीय निवडणुकीनंतर सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असताना अमेरिकेत झालेल्या हिंसाचारावरून भारतातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jan 2021, 5:19 pm
मुंबई: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी तेथील संसदेवर (कॅपिटल हिल) केलेल्या हल्ल्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत. ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ही संधी साधून भारतात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Modi-Trump


करोना लॉकडाऊनच्या काही दिवस आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौरा केला होता. तेव्हा अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर 'नमस्ते ट्रम्प' हा कार्यक्रम आयोजित करून ट्रम्प यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. ट्रम्प यांच्या संपूर्ण दौऱ्यात मोदी त्यांच्यासोबत होते. त्यांनी आपल्या भाषणात ट्रम्प यांचा 'डोनाल्ड' असा उल्लेख करत त्यांच्याशी जवळीक वाढवण्याचाही प्रयत्न केला होता. या कार्यक्रमामुळं भारत-अमेरिका मैत्री अधिक घट्ट होईल व गुंतवणुकीसाठीही फायदा होईल, असं बोललं जात होतं. प्रत्यक्षात या कार्यक्रमावर नंतर टीका झाली. देशात करोनाचा संसर्ग वाढण्यास हा कार्यक्रम जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला होता. आता ट्रम्प यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव आणि काल त्यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेवर केलेल्या हल्ल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलं आहे.

वाचा: 'संभाजीनगर' हा उल्लेख CMO साठी नवा नाही! हा घ्या पुरावा

'अमेरिकेच्या लौकिकाला बाधा पोहोचवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या बेजबाबदार व्यक्तीसाठी लाखो रुपये खर्च करून मोदी यांनी अहमदाबाद येथे कार्यक्रम घेतला. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराची ती जणू एक मोठी रॅलीच होती. निवडणुकीत उमेदवार असलेल्या दुसऱ्या राष्ट्राच्या अध्यक्षासाठी एखाद्या देशात अशी रॅली सहसा आयोजित करणे परराष्ट्र धोरणाला अनुसरून नसते. ट्रम्प यांच्या सोबतच्या नरेंद्र मोदी यांच्या या दोस्तीचे दुष्परिणाम भविष्यात भारताला भोगावे लागणार आहेत, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते, माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

वाचा: नामांतरावर महाविकास आघाडीत तोडगा निघेल; 'या' मंत्र्याला विश्वास

इंग्लंडमध्ये नवा करोना पसरू लागला असताना इंग्लडच्या पंतप्रधानांना प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते. आता त्यांचा दौरा रद्द करण्याची नामुष्की भारतावर ओढवली आहे. याशिवाय, भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळ, श्रीलंका व भूतान या देशामधील राजकीय घटना व चीनचा या देशांवरील वाढत चाललेला प्रभाव या साऱ्यामुळे मोदींच्या परराष्ट्र धोरणातील अपरिपक्वता उघड झाली आहे, असा टोलाही गाडगीळ यांनी हाणला आहे.

वाचा: औरंगाबादचं संभाजीनगर! राऊतांनी सांगितलं काँग्रेसच्या 'मनातलं'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज