म. टा. प्रतिनिधी, मुंबई मुंबईतील अनेक कॉलेजांनी अकरावी प्रवेशाचा ऑफलाइन गोंधळ सुरू केल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत शिक्षण उपसंचालक विभागाने भरारी पथकांच्या नेमणुका केल्या असून ऑफलाइन प्रवेश देणारी कॉलेजे भरारी पथकांच्या रडारवर आली आहेत. बुधवारपासून या पथकांनी कॉलेजांना भेटी देण्यास सुरुवात केली असून दोन दिवसांत जवळपास ५० कॉलेजांना या पथकांनी भेटी दिल्या. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार यंदा अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले. त्यानुसारच यंदा अकरावीचे सर्वच प्रवेश ऑनलाइन करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही अनेक कॉलेजांनी ऑफलाइन प्रवेश सुरू केल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून शिक्षण उपसंचालक विभागाकडे आल्या आहेत. अनेक कॉलेजांनी ऑफलाइन प्रवेश देण्यासाठी छुप्या पद्धतीचा वापर केल्याची माहिती पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुढे आल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेत भरारी पथकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली. चव्हाण म्हणाले की, आरक्षित प्रवेश ऑफलाइन करायचे असले तरी त्याची माहिती ऑनलाइन देणे सक्तीचे आहेत.
ऑफलाइन प्रवेश रडारवर
मुंबईतील अनेक कॉलेजांनी अकरावी प्रवेशाचा ऑफलाइन गोंधळ सुरू केल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत शिक्षण उपसंचालक विभागाने भरारी पथकांच्या नेमणुका केल्या असून ऑफलाइन प्रवेश देणारी कॉलेजे भरारी पथकांच्या रडारवर आली आहेत.
Maharashtra Times 15 Jul 2016, 4:00 am