अ‍ॅपशहर

Omicron in Maharashtra: ओमिक्रॉनबाधितांमध्ये 'ही' लक्षणे तीव्र स्वरूपाची...

ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्यांमध्ये करोनाची लक्षणे फारशी तीव्र दिसत नसली, तरीही काही रुग्णांमध्ये पोटविकाराची लक्षणे तीव्र स्वरूपाची दिसत आहेत, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 28 Jan 2022, 9:33 am
‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Omicron in Maharashtra: ओमायक्रॉनबाधितांमध्ये ही लक्षणे तीव्र स्वरूपाची...


ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्यांमध्ये करोनाची लक्षणे फारशी तीव्र दिसत नसली, तरीही काही रुग्णांमध्ये पोटविकाराची लक्षणे तीव्र स्वरूपाची दिसत आहेत, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. अनेक रुग्ण विविध प्रकारची औषधे, तसेच डॉक्टरांचा सल्ला न घेता प्रतिजैविकांचा मारा करतात त्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडते. तापाचा जोर हा सर्वसाधारपणे तीन दिवस राहतो. अनेक जण चाचण्या करत नाहीत, मात्र करोनासाठी वापरात येणारी औषधे घेतात. त्यामुळेही पोटाचे आरोग्य बिघडते याकडे फिजिशिअन डॉ. रोहन मोरे यांनी लक्ष वेधले.

पोटविकारतज्ज्ञ डॉ. रॉय पाटणकर यांनी करोना संसर्गाच्या काळामध्ये पोटविकारामुळे उलट्या होणे, जेवणाची इच्छा न होणे, डायरिआ, पोट दुखी, पोटामध्ये कळ येणे, सतत दुखणे अशा विविध स्वरूपाच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे सांगितले. पहिल्या दोन्ही लाटांमध्ये ही संख्या कमी होती. आता त्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

ओमिक्रॉनबद्दल आली धक्कादायक माहिती समोर, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांकडून इशारा

जीवनशैली सांभाळा

लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक जणांनी तिखट, मसालेदार तसेच घरी तयार केलेल्या विविध प्रकारच्या पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले. त्यामुळे प्रकृतीच्या विविध प्रकारच्या तक्रारी उद्भवल्या. व्यायामाचा अभाव, फास्ट फूड खाण्यावर नियंत्रण नसणे, झोपेच्या अनियमित वेळांमुळेही अनेक रुग्णांमध्ये वजन वाढण्याच्या, पोट साफ न होण्याच्या व त्यामुळेही पोटदुखीचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. जीवनशैलीमध्ये नियमितता ठेवणे, व्यायाम तसेच चौरस आहार वेळेवर झोप घेतल्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

मुंबईकरांच्या उत्तम सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेसाठी महापालिकेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

काढे, चूर्णांचा मारा नको

करोना संसर्गाच्या भीतीने अनेक जणांनी विविध स्वरूपाच्या काढ्यांचा शरीरावर मारा केला. उष्णतेमुळे सुरू झालेल्या विविध प्रकारच्या शारीरिक व्याधींमध्ये पोटदुखीचा त्रास होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय अतिरिक्त काढे, चूर्ण यांचा मारा करू नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज