म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या बांधकाम कामगारांच्या विशेष नोंदणी मोहिमेंतर्गत ४० दिवसांत सुमारे सव्वा दोन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असून त्यात सर्वाधिक नोंदणी मुंबईत झाली आहे. मुंबईत ७६ हजार २०६ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.
१८ ते ६० वर्षे वयोगटातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. मात्र, त्यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी मंडळाच्या अनेक योजना असूनही त्यांचा लाभ बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मंडळाला फटकारले होते. तसेच मंडळाने अधिकाधिक कामगारांपर्यंत पोहोचायला हवे, असे सांगत त्यादृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश न्यायालयाने एका जनहित याचिकेत दिले होते.
त्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी ई-शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर ४० दिवस ही नोंदणी मोहीम सुरू होती. त्यानुसार, दोन लाख २४ हजार ५७७ कामगारांची नोंदणी झाली असून त्यांना २८ योजनांचा लाभ घेता येणार आहे.
विभागनिहाय नोंदणी
मुंबई विभाग - 76,206
नागपूर विभाग - 30,981
अमरावती विभाग - 22,655
पुणे विभाग - 52,179
नाशिक विभाग - 18,224
औरंगाबाद विभाग - 24,332
एकूण - 2,24,577
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या बांधकाम कामगारांच्या विशेष नोंदणी मोहिमेंतर्गत ४० दिवसांत सुमारे सव्वा दोन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असून त्यात सर्वाधिक नोंदणी मुंबईत झाली आहे. मुंबईत ७६ हजार २०६ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.
१८ ते ६० वर्षे वयोगटातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. मात्र, त्यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी मंडळाच्या अनेक योजना असूनही त्यांचा लाभ बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मंडळाला फटकारले होते. तसेच मंडळाने अधिकाधिक कामगारांपर्यंत पोहोचायला हवे, असे सांगत त्यादृष्टीने पावले उचलण्याचे निर्देश न्यायालयाने एका जनहित याचिकेत दिले होते.
त्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी ई-शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर ४० दिवस ही नोंदणी मोहीम सुरू होती. त्यानुसार, दोन लाख २४ हजार ५७७ कामगारांची नोंदणी झाली असून त्यांना २८ योजनांचा लाभ घेता येणार आहे.
विभागनिहाय नोंदणी
मुंबई विभाग - 76,206
नागपूर विभाग - 30,981
अमरावती विभाग - 22,655
पुणे विभाग - 52,179
नाशिक विभाग - 18,224
औरंगाबाद विभाग - 24,332
एकूण - 2,24,577