अ‍ॅपशहर

फेरीवाल्यांना मारहाण करणे चुकीचे!

प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. त्यासाठी अन्न मिळवणे महत्त्वाचे असते व त्याकरिता काम करावे लागते. रस्त्यांवरील फेरीवाले हे अशा कष्टकऱ्यांपैकी असून, मोलमजुरी करून आपली रोजीरोटी मिळवतात.

Maharashtra Times 4 Nov 2017, 2:00 am
अजय उभारे, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one should not beat hawkers says actor nana patekar
फेरीवाल्यांना मारहाण करणे चुकीचे!


प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. त्यासाठी अन्न मिळवणे महत्त्वाचे असते व त्याकरिता काम करावे लागते. रस्त्यांवरील फेरीवाले हे अशा कष्टकऱ्यांपैकी असून, मोलमजुरी करून आपली रोजीरोटी मिळवतात. त्यांना मारहाण करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. माटुंग्याच्या व्हीजेटीआय कॉलेजच्या ‘टेक्नोवन्झा’ फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या फेस्टिव्हलचा मीडिया पार्टनर आहे.

‘टेक्नोवन्झा’मध्ये नानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विविध सामाजिक विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यापूर्वी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. प्रशासनाच्या अशा कारभाराबद्दल आपण नागरिक म्हणूनही प्रशासनाला कधी विचारले नाही. त्यामुळे ही चूक प्रशासनाची आणि पर्यायाने आपणा सर्वांचीच आहे, असे त म्हणाले. त्यामुळे घडल्या प्रकारचे खापर फेरीवाल्यांच्या माथी मारण्यात काही अर्थ नाही. फेरीवालाही माणूसच आहे, जगण्यासाठी त्याचीही धडपड सुरू असते. त्यामुळे फेरीवाल्यांनसोबत अशी वागणूक चुकीचीच असल्याचे स्पष्ट मत नाना यांनी मांडले. उपस्थित विद्यार्थ्यांनीही त्यांच्या मताला टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दिला.

इतर सामाजिक उपक्रम आणि सद्यस्थितील अनेक विषयांवर नाना आणि विद्यार्थ्यांमध्ये यावेळी चर्चा रंगली. शेतकऱ्यांच्या समस्या, बलात्कार, मानवता आणि विविध सामाजिक समस्यांवरही त्यांनी यावेळी भाष्य केले. ‘टेक्नोवन्झा’च्या शुक्रवारच्या लेक्चर सिरीजला अडीच हजारांहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज