दुसऱ्या यादीत १६ हजार २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश बदलला
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसरी विशेष फेरी काल, शनिवारपासून सुरू झाली. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही, अथवा शाखा बदल करावयाचा असेल, त्यांना या फेरीत भाग घेता येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना नव्याने पसंतीक्रम भरावा लागणार असल्याचे शिक्षण उपसंचालक विभागाने शुक्रवारी जाहीर केले. दरम्यान, शुक्रवारी संपलेल्या दुसऱ्या विशेष फेरीत एकूण १६ हजार ०२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश बदलला आहे.
शिक्षण उपसंचालक विभागातर्फे नुकत्याच पूर्ण करण्यात आलेल्या दुसऱ्या फेरीत एकूण २२ हजार २७३ विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी दिली होती. त्यातील १६ हजार २४ विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेत कॉलेज बदलाचा निर्णय घेतला. उरलेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या विशेष फेरीचे आयोजन शनिवारपासून केलेले आहे. २७, २९ आणि ३० ऑगस्ट रोजी इच्छुक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांवर नव्याने लॉगीन आयडी आणि पासवर्ड घेता येईल. तर २९ आणि ३० ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येईल. तिसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर केली जाईल.
तिसऱ्या विशेष फेरीतही विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना किमान १० आणि कमाल १५ कॉलेजांचा पसंतीक्रम देणे बंधनकारक आहे. गुणवत्ता यादीत नाव जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजात १ ते २ सप्टेंबरदरम्यान प्रवेश निश्चित करायचा आहे.
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसरी विशेष फेरी काल, शनिवारपासून सुरू झाली. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही, अथवा शाखा बदल करावयाचा असेल, त्यांना या फेरीत भाग घेता येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना नव्याने पसंतीक्रम भरावा लागणार असल्याचे शिक्षण उपसंचालक विभागाने शुक्रवारी जाहीर केले. दरम्यान, शुक्रवारी संपलेल्या दुसऱ्या विशेष फेरीत एकूण १६ हजार ०२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश बदलला आहे.
शिक्षण उपसंचालक विभागातर्फे नुकत्याच पूर्ण करण्यात आलेल्या दुसऱ्या फेरीत एकूण २२ हजार २७३ विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी दिली होती. त्यातील १६ हजार २४ विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेत कॉलेज बदलाचा निर्णय घेतला. उरलेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या विशेष फेरीचे आयोजन शनिवारपासून केलेले आहे. २७, २९ आणि ३० ऑगस्ट रोजी इच्छुक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांवर नव्याने लॉगीन आयडी आणि पासवर्ड घेता येईल. तर २९ आणि ३० ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येईल. तिसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर केली जाईल.
तिसऱ्या विशेष फेरीतही विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना किमान १० आणि कमाल १५ कॉलेजांचा पसंतीक्रम देणे बंधनकारक आहे. गुणवत्ता यादीत नाव जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजात १ ते २ सप्टेंबरदरम्यान प्रवेश निश्चित करायचा आहे.