मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या बहुचर्चित ऑनलाइन असेसमेंटवर शुक्रवारी अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात आता नाराजीचा सूर उमटू लागला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानेच नाराजी व्यक्त केली असून सरसकट सगळ्या शाखांसाठी ऑनलाइन असेसमेंट न करता हा निर्णय टप्प्याटप्याने राबविणे गरजेचे असल्याचे मत उच्च शिक्षण विभागातील उच्च अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
विद्यापीठाने सरसकट सगळ्या शाखांसाठी हा निर्णय लागू केल्याने सध्या २२ लाख उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत. त्यातच अनुभवी प्राध्यपकांऐवजी इतर प्राध्यपकांना ही ऑनलाइन असेसमेंटसाठी प्रशिक्षण दिल्याने निकालावर परिणमाची शक्यता वर्तविण्यात आली.
विद्यापीठाने सरसकट सगळ्या शाखांसाठी हा निर्णय लागू केल्याने सध्या २२ लाख उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत. त्यातच अनुभवी प्राध्यपकांऐवजी इतर प्राध्यपकांना ही ऑनलाइन असेसमेंटसाठी प्रशिक्षण दिल्याने निकालावर परिणमाची शक्यता वर्तविण्यात आली.