मुंबई: दाट लोकवस्ती असलेल्या धारावीने सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. धारावीत करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात जवळजवळ यश आले आहे. धारावीतील करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून मंगळवारी संपूर्ण धारावीत करोनाचा केवळ एकमेव रुग्ण आढळून आला. धारावीतील एकूण रुग्णसंख्या आता २ हजार ३३५ इतकी झाली आहे. ( Coronavirus In Dharavi )
वाचा: 'फेरीवाल्यांमुळे करोना पसरेल; परवानगी देणार नाही'
धारावी झोपडपट्टी भागात ५ एप्रिल रोजी करोनाचा एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनतर तसाच दिवस पुन्हा एकदा उजाडला आहे. मंगळवारी धारावीत करोनाचा केवळ एक रुग्ण आढळला. ही धारावीकरांसाठी आणि मुंबईकरांसाठी सुखावणारी बातमी आहे.
पालिका अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धारावीत मंगळवारी एकमेव रुग्ण आढळल्यानंतर या भागातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २ हजार ३३५ इतकी झाली आहे. धारावीत सध्या प्रत्यक्षात ३५२ रुग्ण उपचार घेत असून १ हजार ७३५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबई शहरात करोनाने शिरकाव केल्यानंतर १ एप्रिल रोजी धारावीत करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता.
वाचा: अंतर्विरोध, अंतरपाट नाही; आम्ही वरमाला घातल्यात: संजय राऊत
दरम्यान, २.५ चौरस किलोमीटर इतक्या भागात पसरलेल्या धारावीत सुमारे साडेसहा लाख लोकांचे वास्तव्य आहे. आशिया खंडातील या सर्वात मोठ्या झोपडपट्टीला करोनाचा विळखा पडल्याने सर्वांसाठीच ते मोठे आव्हान होते. मुंबई पालिकेचे नव्या दमाचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निमित्ताने केलेल्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर धारावीला करोनामुक्त करण्यासाठी नियोजनबद्धपणे पावले टाकली. दाट लोकवस्ती असलेल्या या भागात करोना नियंत्रणात आणणे अशक्यप्राय असल्याचे वाटत होते. मात्र, पालिका यंत्रणेने अहोरात्र झटून धारावीला करोनाच्या विळख्यातून आता जवळजवळ बाहेर काढले आहे.
वाचा: पुण्यातील आमदार व माजी महापौर मुक्ता टिळक यांनाही करोना
मुंबईत ६४ रुग्णांचा मृत्यू
राज्यात मंगळवारी २२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात मुंबईतील ६४ आणि पुण्यातील २७ रुग्णांचा समावेश आहे. त्याशिवाय ठाणे महापालिका आणि कल्याण-डोंबिवली प्रत्येकी १३, मीरा भाईंदर ११, पनवेल महापालिका ०९, वसई विरार ०८, ठाणे ०७, उल्हासनगर ०५, भिवंडी ०३, नवी मुंबई ०२ इतके रुग्णांचे मृत्यू झाले. यामुळे राज्यातील करोनामृत्यूंची एकूण संख्या नऊ हजार २५० इतकी झाली आहे, तर मुंबईतील मृत्यूंचा आकडा पाच हजार ०२ झाला आहे. राज्यात मंगळवारी पाच हजार १३४ नवे रुग्ण आढळले असून, यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या दोन लाख १७ हजार १२१ झाली आहे.
'मातोश्री'वर जाण्यात मला अजिबात कमीपणा वाटत नाही: शरद पवार
वाचा: 'फेरीवाल्यांमुळे करोना पसरेल; परवानगी देणार नाही'
धारावी झोपडपट्टी भागात ५ एप्रिल रोजी करोनाचा एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनतर तसाच दिवस पुन्हा एकदा उजाडला आहे. मंगळवारी धारावीत करोनाचा केवळ एक रुग्ण आढळला. ही धारावीकरांसाठी आणि मुंबईकरांसाठी सुखावणारी बातमी आहे.
पालिका अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धारावीत मंगळवारी एकमेव रुग्ण आढळल्यानंतर या भागातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २ हजार ३३५ इतकी झाली आहे. धारावीत सध्या प्रत्यक्षात ३५२ रुग्ण उपचार घेत असून १ हजार ७३५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबई शहरात करोनाने शिरकाव केल्यानंतर १ एप्रिल रोजी धारावीत करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता.
वाचा: अंतर्विरोध, अंतरपाट नाही; आम्ही वरमाला घातल्यात: संजय राऊत
दरम्यान, २.५ चौरस किलोमीटर इतक्या भागात पसरलेल्या धारावीत सुमारे साडेसहा लाख लोकांचे वास्तव्य आहे. आशिया खंडातील या सर्वात मोठ्या झोपडपट्टीला करोनाचा विळखा पडल्याने सर्वांसाठीच ते मोठे आव्हान होते. मुंबई पालिकेचे नव्या दमाचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निमित्ताने केलेल्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर धारावीला करोनामुक्त करण्यासाठी नियोजनबद्धपणे पावले टाकली. दाट लोकवस्ती असलेल्या या भागात करोना नियंत्रणात आणणे अशक्यप्राय असल्याचे वाटत होते. मात्र, पालिका यंत्रणेने अहोरात्र झटून धारावीला करोनाच्या विळख्यातून आता जवळजवळ बाहेर काढले आहे.
वाचा: पुण्यातील आमदार व माजी महापौर मुक्ता टिळक यांनाही करोना
मुंबईत ६४ रुग्णांचा मृत्यू
राज्यात मंगळवारी २२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात मुंबईतील ६४ आणि पुण्यातील २७ रुग्णांचा समावेश आहे. त्याशिवाय ठाणे महापालिका आणि कल्याण-डोंबिवली प्रत्येकी १३, मीरा भाईंदर ११, पनवेल महापालिका ०९, वसई विरार ०८, ठाणे ०७, उल्हासनगर ०५, भिवंडी ०३, नवी मुंबई ०२ इतके रुग्णांचे मृत्यू झाले. यामुळे राज्यातील करोनामृत्यूंची एकूण संख्या नऊ हजार २५० इतकी झाली आहे, तर मुंबईतील मृत्यूंचा आकडा पाच हजार ०२ झाला आहे. राज्यात मंगळवारी पाच हजार १३४ नवे रुग्ण आढळले असून, यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या दोन लाख १७ हजार १२१ झाली आहे.
'मातोश्री'वर जाण्यात मला अजिबात कमीपणा वाटत नाही: शरद पवार