मुंबई
राज्यातील अवयव प्रत्यारोपण चळवळीचा वेग वाढावा, त्यात नव्या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाची मदत घेता यावी यासाठी केंद्र सरकारने राज्यात विभागीय अवयव उती प्रत्यारोपण समिती (रोटो) आणि राज्य उती प्रत्यारोपण समितीची (सोटो) स्थापना करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, त्यासाठी संमत केलेला निधी केंद्राकडून रखडल्याने केईएम रुग्णालयात सुरू होणाऱ्या संबंधित केंद्राचे काम दोन वर्षांपासून रखडले होते. हा निधी अखेर केईएमला मिळाला असून, त्यामुळे अवयवदानासह उती प्रत्यारोपणाच्या मोहिमेलाही निश्चितच बळ मिळणार आहे.
राज्यात अवयवदानाच्या संदर्भात सुरू असलेल्या जनजागृती कार्यक्रमामुळे अवयवदानाच्या चळवळीला वेग आला आहे. या मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात बाळाची नाळही शरीरातील इतर पेशींप्रमाणे जतन करता यावी यासाठी केंद्राने ‘रोटो’ आणि ‘सोटो’ केंद्राची स्थापना करण्यास परवानगी दिली. त्यानुसार केईएमध्ये हे केंद्र स्थापन होणार आहे. मात्र, केंद्र सरकारकडून निधी मिळवण्यास राज्य सरकारला यश न आल्याने या केंद्राचे काम तब्बल दोन वर्षांपासून रखडले होते. हा रखडलेला निधी मिळाल्याने केईएममध्ये महिनाभरात या केंद्राची सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने काम सुरू झाल्याच्या माहितीस केईएमचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनीही दुजोरा दिला आहे. केंद्राच्या काळजीवाहू सचिव म्हणून सध्या अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातील अनुभवी डॉ. सुजाता पटवर्धन यांची नेमणूक करण्यात आली असून, लवकरच संचालक, सहसंचालक व समन्वयक ही पदेही भरली जाणार आहेत.
केंद्राच्या उभारणीसाठी इतर आवश्यक असलेल्या यंत्रणा उपलब्ध व्हाव्यात यासाठीही निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. केंद्राच्या समितीमध्ये तीन सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे. या उपक्रमाविषयी जागृती करणे, नोंदी ठेवणे तसेच डॉक्टरांना प्रशिक्षित करणे यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या जाणार आहेत.
राज्यातील अवयव प्रत्यारोपण चळवळीचा वेग वाढावा, त्यात नव्या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाची मदत घेता यावी यासाठी केंद्र सरकारने राज्यात विभागीय अवयव उती प्रत्यारोपण समिती (रोटो) आणि राज्य उती प्रत्यारोपण समितीची (सोटो) स्थापना करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, त्यासाठी संमत केलेला निधी केंद्राकडून रखडल्याने केईएम रुग्णालयात सुरू होणाऱ्या संबंधित केंद्राचे काम दोन वर्षांपासून रखडले होते. हा निधी अखेर केईएमला मिळाला असून, त्यामुळे अवयवदानासह उती प्रत्यारोपणाच्या मोहिमेलाही निश्चितच बळ मिळणार आहे.
राज्यात अवयवदानाच्या संदर्भात सुरू असलेल्या जनजागृती कार्यक्रमामुळे अवयवदानाच्या चळवळीला वेग आला आहे. या मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात बाळाची नाळही शरीरातील इतर पेशींप्रमाणे जतन करता यावी यासाठी केंद्राने ‘रोटो’ आणि ‘सोटो’ केंद्राची स्थापना करण्यास परवानगी दिली. त्यानुसार केईएमध्ये हे केंद्र स्थापन होणार आहे. मात्र, केंद्र सरकारकडून निधी मिळवण्यास राज्य सरकारला यश न आल्याने या केंद्राचे काम तब्बल दोन वर्षांपासून रखडले होते. हा रखडलेला निधी मिळाल्याने केईएममध्ये महिनाभरात या केंद्राची सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने काम सुरू झाल्याच्या माहितीस केईएमचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनीही दुजोरा दिला आहे. केंद्राच्या काळजीवाहू सचिव म्हणून सध्या अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातील अनुभवी डॉ. सुजाता पटवर्धन यांची नेमणूक करण्यात आली असून, लवकरच संचालक, सहसंचालक व समन्वयक ही पदेही भरली जाणार आहेत.
केंद्राच्या उभारणीसाठी इतर आवश्यक असलेल्या यंत्रणा उपलब्ध व्हाव्यात यासाठीही निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. केंद्राच्या समितीमध्ये तीन सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे. या उपक्रमाविषयी जागृती करणे, नोंदी ठेवणे तसेच डॉक्टरांना प्रशिक्षित करणे यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या जाणार आहेत.