म. टा. प्रतिनिधी, मुंबई
सास-बहू तसेच जादुटोण्याने खच्चून भरलेल्या भारतीय हिंदी मालिकांचा चाहता वर्ग भारतासह पाकिस्तानातही आहे. परंतु, पाकिस्तानने आता अनेक भारतीय मालिकांच्या प्रसारणांवर बंदी घातली आहे. भारतीय मालिकांचा आशय संवेदनशील असतो, असे सांगत ‘पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अॅथॉरिटी’ने (PEMRA) भारतीय मालिकांचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानातील स्थानिक वाहिन्यांवर प्रसिद्ध परदेशी मालिका दाखवल्या जातात. याच वाहिन्यांवर आपल्याकडील अनेक हिंदी मालिकांचा समावेश होतो. यह रिश्ता क्या कहलाता है, कुमकुम भाग्य, चक्रवर्ती सम्राट अशोक, तारक मेहता का उल्टा चष्मा, यह है मोहब्बते, संकटमोचन हनुमान आदी मालिका पाकिस्तानात दाखवल्या जातात. आता मात्र या सर्वच मालिकांना चाळण लागणार आहे. केवळ सहा टक्के मालिकांनाच ‘ना हरकत’ देण्याबाबत ‘पेम्रा’ विचार करत आहे. या सगळ्या प्रकारावर भारतीय कलाकार आणि टीव्ही इंडस्ट्रीतून नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवर कलर्स वाहिनीचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले ‘आपल्याकडील सर्व मालिका सॅटेलाइट फूटप्रिंट्सवर अपलोड होत असतात. ज्या देशांना त्या मालिका प्रक्षेपित करायच्या असतील ते देश त्यांच्या ब्रॉडकास्ट मिनिस्ट्रीशी चर्चा करून सॅटेलाइटवरून त्या मालिका घेऊ शकतात. अशा मालिकांना ‘सिंडिकेटेड कन्टेन्ट’ म्हणतात. पाकमध्ये भारतीय मालिका न दाखवण्याच्या निर्णयामुळे भारतीय टेलिव्हिजन उद्योगावर विशेष काही परिणाम होईल असे मला वाटत नाही.’
पाकिस्तानातून माझे अनेक चाहते मला मेसेज करत असतात. आमच्या मालिका तिकडे दाखवणे बंद केले, तर चाहते नाराज होतील. शिवाय भारतीय वाहिन्यांच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवर त्याचा थेट परिणाम होईल.- दिव्यांका त्रिपाठी, अभिनेत्री
या निर्णयामुळे पायरसीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या आवडीच्या मालिका सरकारी नियमांमुळे बघायला न मिळाल्याने या ना त्या प्रकारे त्या मालिका बघण्याचा प्रयत्न केला जाईल.
- इक्बाल खान, अभिनेता
सास-बहू तसेच जादुटोण्याने खच्चून भरलेल्या भारतीय हिंदी मालिकांचा चाहता वर्ग भारतासह पाकिस्तानातही आहे. परंतु, पाकिस्तानने आता अनेक भारतीय मालिकांच्या प्रसारणांवर बंदी घातली आहे. भारतीय मालिकांचा आशय संवेदनशील असतो, असे सांगत ‘पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अॅथॉरिटी’ने (PEMRA) भारतीय मालिकांचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानातील स्थानिक वाहिन्यांवर प्रसिद्ध परदेशी मालिका दाखवल्या जातात. याच वाहिन्यांवर आपल्याकडील अनेक हिंदी मालिकांचा समावेश होतो. यह रिश्ता क्या कहलाता है, कुमकुम भाग्य, चक्रवर्ती सम्राट अशोक, तारक मेहता का उल्टा चष्मा, यह है मोहब्बते, संकटमोचन हनुमान आदी मालिका पाकिस्तानात दाखवल्या जातात. आता मात्र या सर्वच मालिकांना चाळण लागणार आहे. केवळ सहा टक्के मालिकांनाच ‘ना हरकत’ देण्याबाबत ‘पेम्रा’ विचार करत आहे. या सगळ्या प्रकारावर भारतीय कलाकार आणि टीव्ही इंडस्ट्रीतून नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवर कलर्स वाहिनीचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले ‘आपल्याकडील सर्व मालिका सॅटेलाइट फूटप्रिंट्सवर अपलोड होत असतात. ज्या देशांना त्या मालिका प्रक्षेपित करायच्या असतील ते देश त्यांच्या ब्रॉडकास्ट मिनिस्ट्रीशी चर्चा करून सॅटेलाइटवरून त्या मालिका घेऊ शकतात. अशा मालिकांना ‘सिंडिकेटेड कन्टेन्ट’ म्हणतात. पाकमध्ये भारतीय मालिका न दाखवण्याच्या निर्णयामुळे भारतीय टेलिव्हिजन उद्योगावर विशेष काही परिणाम होईल असे मला वाटत नाही.’
पाकिस्तानातून माझे अनेक चाहते मला मेसेज करत असतात. आमच्या मालिका तिकडे दाखवणे बंद केले, तर चाहते नाराज होतील. शिवाय भारतीय वाहिन्यांच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवर त्याचा थेट परिणाम होईल.- दिव्यांका त्रिपाठी, अभिनेत्री
या निर्णयामुळे पायरसीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या आवडीच्या मालिका सरकारी नियमांमुळे बघायला न मिळाल्याने या ना त्या प्रकारे त्या मालिका बघण्याचा प्रयत्न केला जाईल.
- इक्बाल खान, अभिनेता