म. टा. प्रतिनिधी, मुंबई
देशाचे माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त विलेपार्ले येथे ‘अटल गीतगंगा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलांवत व गायकांनी वाजपेयी यांच्या कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यानिमित्ताने भाजपचे माजी खासदार लालजी टंडन यांचा ‘अटल सन्मान’ हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त दीप कमल फाऊंडेशनच्यावतीने विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर सभागृहात ‘अटल गीतगंगा’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांनी वाजपेयी यांची ‘हिंदू तन, मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय’ ही कविता वीररसाच्या शैलीत सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. संगीतकार ललित पंडित यांनी ‘आझादी का गीत नहीं मना गुलामी के बीच’ हे गाणं त्यांच्या खास शैलीत सादर केले. गायिका मिष्टु वर्धन व भोजपुरी गायक सुरेश शुल्क यांनीही वाजपेयी यांच्या कविता सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. डॉ. राही मासुम रझा यांच्या स्नुषा व प्रख्यात गायिका पार्वती खान म्हणाल्या, अटल बिहारी वाजपेयींनी लिहिलेली ‘उन्हे याद करे’ ही कविता गायली, त्यानंतर वाजपेयी यांनी स्वतः त्यांच्या गाण्याचा आल्बम आपल्याला भेट दिल्याची आठवण सांगितली.
लखनऊचे माजी खासदार लालजी टंडन यांना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ‘अटल सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ‘दीप कमल फाऊंडेशन’चे अध्यक्ष कमलजीत मिश्र, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे प्रदेश पदाधिकारी रवींद्र भुसारी, सुनील कर्जतकर आदी उपस्थति होते.
देशाचे माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त विलेपार्ले येथे ‘अटल गीतगंगा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलांवत व गायकांनी वाजपेयी यांच्या कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यानिमित्ताने भाजपचे माजी खासदार लालजी टंडन यांचा ‘अटल सन्मान’ हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त दीप कमल फाऊंडेशनच्यावतीने विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर सभागृहात ‘अटल गीतगंगा’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांनी वाजपेयी यांची ‘हिंदू तन, मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय’ ही कविता वीररसाच्या शैलीत सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. संगीतकार ललित पंडित यांनी ‘आझादी का गीत नहीं मना गुलामी के बीच’ हे गाणं त्यांच्या खास शैलीत सादर केले. गायिका मिष्टु वर्धन व भोजपुरी गायक सुरेश शुल्क यांनीही वाजपेयी यांच्या कविता सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. डॉ. राही मासुम रझा यांच्या स्नुषा व प्रख्यात गायिका पार्वती खान म्हणाल्या, अटल बिहारी वाजपेयींनी लिहिलेली ‘उन्हे याद करे’ ही कविता गायली, त्यानंतर वाजपेयी यांनी स्वतः त्यांच्या गाण्याचा आल्बम आपल्याला भेट दिल्याची आठवण सांगितली.
लखनऊचे माजी खासदार लालजी टंडन यांना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ‘अटल सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ‘दीप कमल फाऊंडेशन’चे अध्यक्ष कमलजीत मिश्र, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे प्रदेश पदाधिकारी रवींद्र भुसारी, सुनील कर्जतकर आदी उपस्थति होते.