म. टा. प्रतिनिधी, मुंबई
विदर्भातील अकोला लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे आपण खासदार झालो, हे शरद पवार यांचे विधान सत्याचा अपलाप करणारे आहे. पवार यांनी खोटे बोलू नये. माझे राजकारण आणि त्यांचा संबंध नाही, असे प्रत्युत्तर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिले आहे.
काँग्रेससोबत १९९७-१९९८ मध्ये सीताराम केसरी यांच्याबरोबर समझोता झाला होता. या वाटाघाटीत शरद पवार कुठेच नव्हते. शरद पवार यांना भेटायचे आहे, असा निरोप मुंबईतील काँग्रेस नेते मुरली देवरा यांनी आपणास त्यावेळी दिला होता. तेव्हा ते घरी येऊन समझोतामध्ये घ्या असे म्हणाले. पवार यांनी व्यक्तिगत बोलू नये. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत अकोल्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने लाख-सव्वा लाख मते घेतली होती, असे आंबेडकर यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या राजवटीत एका राफेल विमानाची किंमत ७१२ कोटी रुपये होती. ती भाजपच्या काळात १६०० कोटी रुपये झाल्याचा दावा करून अचानक ही किंमत कशामुळे वाढली हे देशातील जनतेला समजले पाहिजे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे. हिंदुस्थान एरॉनिटीक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीकडील काम काढून ते बड्या उद्योगपतींच्या कंपनीकडे का दिले, याचाही सरकारने खुलासा करावा, असे आंबेडकर म्हणाले.
विदर्भातील अकोला लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे आपण खासदार झालो, हे शरद पवार यांचे विधान सत्याचा अपलाप करणारे आहे. पवार यांनी खोटे बोलू नये. माझे राजकारण आणि त्यांचा संबंध नाही, असे प्रत्युत्तर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिले आहे.
काँग्रेससोबत १९९७-१९९८ मध्ये सीताराम केसरी यांच्याबरोबर समझोता झाला होता. या वाटाघाटीत शरद पवार कुठेच नव्हते. शरद पवार यांना भेटायचे आहे, असा निरोप मुंबईतील काँग्रेस नेते मुरली देवरा यांनी आपणास त्यावेळी दिला होता. तेव्हा ते घरी येऊन समझोतामध्ये घ्या असे म्हणाले. पवार यांनी व्यक्तिगत बोलू नये. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत अकोल्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने लाख-सव्वा लाख मते घेतली होती, असे आंबेडकर यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या राजवटीत एका राफेल विमानाची किंमत ७१२ कोटी रुपये होती. ती भाजपच्या काळात १६०० कोटी रुपये झाल्याचा दावा करून अचानक ही किंमत कशामुळे वाढली हे देशातील जनतेला समजले पाहिजे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे. हिंदुस्थान एरॉनिटीक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीकडील काम काढून ते बड्या उद्योगपतींच्या कंपनीकडे का दिले, याचाही सरकारने खुलासा करावा, असे आंबेडकर म्हणाले.