म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मुलांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था मुंबई पोलिसांच्या मदतीने बालमजुरीविरोधात घेत असलेल्या मोहिमा, तसेच छापेसत्रांमुळे मुंबईतील बालमजुरीला मोठ्या प्रमाणात रोख लागल्याचे दिसून येत आहे. प्रथम या सामाजिक संस्थेने गेल्या तीन महिन्यांत केलेल्या सर्वेक्षणामध्ये मुंबईतील बालमजुरीचे प्रमाण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खाली आल्याचे दिसून आले आहे.
मुंबईमध्ये तीन लाख तर ठाण्यात २५ हजार दुकानांमधून बालमजूर काम करतात का, यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. मुंबईमध्ये १४ वर्षांखाली १५२ मुले बालमजूर म्हणून काम करताना आढळली. हॉटेलमध्ये काम करत असलेल्या या मुलांचे प्रमाण इतर ठिकाणच्या बालमजुरीपेक्षा अधिक होते. मालकांना कायद्याचा धाक दाखवून मुलांकडून काम करून घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. ज्यांनी मुले काम करत नाहीत असे सांगूनही मुलांना कामाला ठेवले होते, अशा २५ ठिकाणी संस्थेने पोलिसांच्या मदतीने रेड टाकल्या, त्यातून ६३ मुलांची बालमजुरीमधून सुटका केली.
मुंबईतील १५ पोलिस स्टेशन्सच्या सहकार्याने प्रथमने वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये ही कारवाई केली. पाच वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती, अनेक दुकानांमध्ये आमच्याकडे बालमजूर नाहीत, अशा पाट्या लावूनही मुलांना राबवून घेतले जायचे. दुकानांच्या, हॉटेलच्या आतमध्ये मात्र मुलांना छुप्या पद्धतीने राबवून घेतले जात होते. हे प्रमाण आता कमी झाले आहे.
कायद्याची जरब
गेल्या काही वर्षात बालमजुरी प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे कायद्याची जरब आता बसू लागली आहे. तरीही ही लढाई आता अधिक टोकदार करावी लागणार असल्याचे मुलांच्या हक्क व अधिकाराच्या प्रश्नांवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सांगतात. मुलग्यांच्या तुलनेत बालमजुरीमध्ये मुलींना लोटण्याचे प्रमाणही कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मुलांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था मुंबई पोलिसांच्या मदतीने बालमजुरीविरोधात घेत असलेल्या मोहिमा, तसेच छापेसत्रांमुळे मुंबईतील बालमजुरीला मोठ्या प्रमाणात रोख लागल्याचे दिसून येत आहे. प्रथम या सामाजिक संस्थेने गेल्या तीन महिन्यांत केलेल्या सर्वेक्षणामध्ये मुंबईतील बालमजुरीचे प्रमाण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खाली आल्याचे दिसून आले आहे.
मुंबईमध्ये तीन लाख तर ठाण्यात २५ हजार दुकानांमधून बालमजूर काम करतात का, यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. मुंबईमध्ये १४ वर्षांखाली १५२ मुले बालमजूर म्हणून काम करताना आढळली. हॉटेलमध्ये काम करत असलेल्या या मुलांचे प्रमाण इतर ठिकाणच्या बालमजुरीपेक्षा अधिक होते. मालकांना कायद्याचा धाक दाखवून मुलांकडून काम करून घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. ज्यांनी मुले काम करत नाहीत असे सांगूनही मुलांना कामाला ठेवले होते, अशा २५ ठिकाणी संस्थेने पोलिसांच्या मदतीने रेड टाकल्या, त्यातून ६३ मुलांची बालमजुरीमधून सुटका केली.
मुंबईतील १५ पोलिस स्टेशन्सच्या सहकार्याने प्रथमने वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये ही कारवाई केली. पाच वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती, अनेक दुकानांमध्ये आमच्याकडे बालमजूर नाहीत, अशा पाट्या लावूनही मुलांना राबवून घेतले जायचे. दुकानांच्या, हॉटेलच्या आतमध्ये मात्र मुलांना छुप्या पद्धतीने राबवून घेतले जात होते. हे प्रमाण आता कमी झाले आहे.
कायद्याची जरब
गेल्या काही वर्षात बालमजुरी प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे कायद्याची जरब आता बसू लागली आहे. तरीही ही लढाई आता अधिक टोकदार करावी लागणार असल्याचे मुलांच्या हक्क व अधिकाराच्या प्रश्नांवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सांगतात. मुलग्यांच्या तुलनेत बालमजुरीमध्ये मुलींना लोटण्याचे प्रमाणही कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे.