- नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध
- उमेदवार 'पीएचडी'धारक असण्याची अट
- पदवीधारकांचा अपमान असल्याची भावना
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
तीन वर्षे पदवीचे शिक्षण व त्यानंतर दोन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून किमान पाच वर्षांमध्ये पीएचडी मिळवायची आणि कंत्राटी प्राध्यापक म्हणून रूजे व्हायचे, असा काहीसा कृष्णकाळ उच्च शिक्षणात पाहावयास मिळत आहे. मुंबईतील प्रथितयश 'वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूमध्ये (व्हीजेटीआय) अशाच कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 'पीएचडी'धारकांना अशाप्रकारे कंत्राटी म्हणून नियुक्त करणे अपमानास्पद बाब असल्याची भावना शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे.
इंजिनीअरिंग क्षेत्रातील नामांकित संस्थांपैकी एक अशी 'व्हीजेटीआय'ची ओळख आहे. यामध्ये शिक्षक घेणे हे अनेक विद्यार्थ्यांचे जसे स्वप्न असते, तसेच इथे अध्यापनाचे काम करावे अशी अनेक प्राध्यापकांची इच्छा असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून संस्थेत कोणत्याही प्रकारची भरती होत नसल्यामुळे कुणालाच संधी मिळत नाही. सध्या इथे काही व्याख्याते कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत. याचवेळी नियमित पदांची जाहिरात काढण्याऐवजी संस्थेने कंत्राटी तत्त्वावरील पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्थात, ही नियुक्ती करत असताना पदाची पात्रता 'पीएचडी' ठेवण्यात आली आहे.
संस्थेतील विविध ११ विभागांसाठी ही पदभरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करताना एक हजार रुपये भरण्याचेही जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. या उमेदवारांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी होणार आहे. या कालावधीतील कामगिरी पाहून ती कमाल तीन वर्षांपर्यंत वाढवली जाईल. कोणतीही नियुक्ती करत असताना आरक्षण धोरण अवलंबले पाहिजे. यामध्ये तसे करण्यात आलेले नाही. तसेच 'पीएचडी'धारकांना व्याख्यात्यांना दिल्या जाणाऱ्या वेतनात नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे या प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यासंदर्भात संस्थेचे संचालक धीरेन पटेल यांच्याशी संपर्क साधला असता रात्री उशिरापर्यंत तो संपर्क होऊ शकला नाही.
प्रतिज्ञापत्राची अट
या भरतीत नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांनी भविष्यात 'व्हीजेटीआय'मध्ये कोणत्याही प्रकारची नियमित नियुक्ती मागणार नाही, अशी हमी देणारे प्रतिज्ञापत्र १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सादर करावयाचे आहे. या अटीमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे.
...
'पीएचडी'धारक उमेदवार कंत्राटी पद्धतीने नियुक्त करणे ही अपमानास्पद बाब आहे. नियमित प्रक्रिया पार पाडून पूर्णवेळ नियुक्ती करण्याऐवजी अशाप्रकारे कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करणे पूर्णपणे चुकीचे आहे. तसेच उमेदवारांकडून अर्ज करताना पैसे घेणे म्हणजे संचालकांनी यात व्यापारी दृष्टिकोन ठेवला की काय असा संशय येतो.
- वैभव नरवडे, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ
- उमेदवार 'पीएचडी'धारक असण्याची अट
- पदवीधारकांचा अपमान असल्याची भावना
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
तीन वर्षे पदवीचे शिक्षण व त्यानंतर दोन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून किमान पाच वर्षांमध्ये पीएचडी मिळवायची आणि कंत्राटी प्राध्यापक म्हणून रूजे व्हायचे, असा काहीसा कृष्णकाळ उच्च शिक्षणात पाहावयास मिळत आहे. मुंबईतील प्रथितयश 'वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूमध्ये (व्हीजेटीआय) अशाच कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 'पीएचडी'धारकांना अशाप्रकारे कंत्राटी म्हणून नियुक्त करणे अपमानास्पद बाब असल्याची भावना शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे.
इंजिनीअरिंग क्षेत्रातील नामांकित संस्थांपैकी एक अशी 'व्हीजेटीआय'ची ओळख आहे. यामध्ये शिक्षक घेणे हे अनेक विद्यार्थ्यांचे जसे स्वप्न असते, तसेच इथे अध्यापनाचे काम करावे अशी अनेक प्राध्यापकांची इच्छा असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून संस्थेत कोणत्याही प्रकारची भरती होत नसल्यामुळे कुणालाच संधी मिळत नाही. सध्या इथे काही व्याख्याते कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत. याचवेळी नियमित पदांची जाहिरात काढण्याऐवजी संस्थेने कंत्राटी तत्त्वावरील पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्थात, ही नियुक्ती करत असताना पदाची पात्रता 'पीएचडी' ठेवण्यात आली आहे.
संस्थेतील विविध ११ विभागांसाठी ही पदभरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करताना एक हजार रुपये भरण्याचेही जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. या उमेदवारांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी होणार आहे. या कालावधीतील कामगिरी पाहून ती कमाल तीन वर्षांपर्यंत वाढवली जाईल. कोणतीही नियुक्ती करत असताना आरक्षण धोरण अवलंबले पाहिजे. यामध्ये तसे करण्यात आलेले नाही. तसेच 'पीएचडी'धारकांना व्याख्यात्यांना दिल्या जाणाऱ्या वेतनात नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे या प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यासंदर्भात संस्थेचे संचालक धीरेन पटेल यांच्याशी संपर्क साधला असता रात्री उशिरापर्यंत तो संपर्क होऊ शकला नाही.
प्रतिज्ञापत्राची अट
या भरतीत नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांनी भविष्यात 'व्हीजेटीआय'मध्ये कोणत्याही प्रकारची नियमित नियुक्ती मागणार नाही, अशी हमी देणारे प्रतिज्ञापत्र १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सादर करावयाचे आहे. या अटीमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे.
...
'पीएचडी'धारक उमेदवार कंत्राटी पद्धतीने नियुक्त करणे ही अपमानास्पद बाब आहे. नियमित प्रक्रिया पार पाडून पूर्णवेळ नियुक्ती करण्याऐवजी अशाप्रकारे कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करणे पूर्णपणे चुकीचे आहे. तसेच उमेदवारांकडून अर्ज करताना पैसे घेणे म्हणजे संचालकांनी यात व्यापारी दृष्टिकोन ठेवला की काय असा संशय येतो.
- वैभव नरवडे, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ