मुंबई:
राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार का? यावर चर्चा सुरू असतानाच, मराठा आरक्षण विधेयकाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. अॅड. जयश्री पाटील यांनी आरक्षणाविरोधात आज, सोमवारी याचिका दाखल केली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी सरकारनं मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर केलं. मराठा आरक्षणासाठी कायदा करण्याचे विधेयक राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करून घेतले. त्यावर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर मराठा आरक्षणाचा कायदा राज्यात लागू झाला आहे. मात्र, हे विधेयक न्यायालयात टिकेल का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यात आता मराठा आरक्षण विधेयकाला आव्हान देणारी याचिका अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार का? यावर चर्चा सुरू असतानाच, मराठा आरक्षण विधेयकाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. अॅड. जयश्री पाटील यांनी आरक्षणाविरोधात आज, सोमवारी याचिका दाखल केली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी सरकारनं मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर केलं. मराठा आरक्षणासाठी कायदा करण्याचे विधेयक राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करून घेतले. त्यावर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर मराठा आरक्षणाचा कायदा राज्यात लागू झाला आहे. मात्र, हे विधेयक न्यायालयात टिकेल का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यात आता मराठा आरक्षण विधेयकाला आव्हान देणारी याचिका अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.