Mumbai Plane Crash: चाचणीसाठी जबरदस्ती?
हवामान ढगाळ असल्यामुळे आणि विमानामध्येही तांत्रिक बिघाड असल्यामुळे गुरुवारी विमान चाचणी घेऊ नये, असे मारिया झुबेर यांनी स्पष्टपणे यू वाय एव्हिएशन कंपनीला सांगितले होते, तरीही जबरदस्तीने या चाचण्या का घेण्यात आल्या? असा संतप्त सवाल या विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमखी पडलेल्या वैमानिक मारिया व राजपूत कुटुंबीयांनी उपस्थित केला.
Maharashtra Times 29 Jun 2018, 10:16 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
हवामान ढगाळ असल्यामुळे आणि विमानामध्येही तांत्रिक बिघाड असल्यामुळे गुरुवारी विमान चाचणी घेऊ नये, असे मारिया झुबेर यांनी स्पष्टपणे यू वाय एव्हिएशन कंपनीला सांगितले होते, तरीही जबरदस्तीने या चाचण्या का घेण्यात आल्या? असा संतप्त सवाल या विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमखी पडलेल्या वैमानिक मारिया व राजपूत यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला. त्यांच्या जिवापेक्षा नफा कमावणे अधिक महत्त्वाचे होते का, असा संतापही या कुटुंबीयांनी व्यक्त केला.
'मारिया यांना एक हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव होता. तरीही गुरुवारची विमान चाचणी करण्यासाठी त्या तयार नव्हत्या. तसे त्यांनी आपल्याला सांगितले होते. प्रदीप राजपूत यांनीही चाचणी न घेण्याची सूचना कंपनी व्यवस्थापनाला केली होती. मात्र, कंपनीने प्रदीप आणि मारियांनी दिलेल्या सूचना पाळल्या नाहीत', असे मारियांचे पती अॅड. प्रभात कथुरिया उद्वेगाने म्हणाले. कंपनीच्या हट्टामुळेच मारिया आणि इतरांचा घाटकोपरमधील दुर्घटनेत मृत्यू झाला असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
यू वाय कंपनीने आग्रह केल्यामुळे सकाळी आठ वाजता मारिया घरून निघाल्या. ही विमान चाचणी साधारणतः पावणे दोन तासांची असते. दोन तास झाले तरीही मारिया यांचा मेसेज न आल्यामुळे प्रभात यांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास 'तू कुठे आहेस?' असा मेसेज त्यांना पाठवला. मात्र, त्याचे उत्तर मिळाले नाही. त्याचवेळी काहीतरी विपरित घडले की काय, अशी शंका मनात आल्याचे प्रभात यांनी सांगितले. मेसेजला उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी एव्हीएशन कंपनीमध्ये फोन केला, तिथूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचवेळी टीव्हीवर ते विमान कोसळल्याचे कळले आणि प्रभात यांनी लगेचच राजावाडी रुग्णालयाकडे धाव घेतली. मारिया यांना पंधरा वर्षांची मुलगी आहे.
'त्यांचे ऋण कायम राहील'
या विमानाचे वैमानिक प्रदीप राजपूत हे दिल्लीचे रहिवासी होते. कांदिवली येथे राहणाऱ्या त्यांच्या भावोजींनी, एस. एस. तिवारी यांनीही 'राजपूत आणि मारिया यांनी त्या क्षणी घेतलेल्या निर्णय़ामुळे अनेकांचे प्राण वाचले', असे सांगितले. मात्र, ज्यांच्यामुळे ही दुर्घटना घडली त्यांना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी केली. 'प्रदीप यांना वीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता. स्वतःचा जीव गमावून त्यांनी शेकडो माणसांचे प्राण वाचवले. त्याचे ऋण कायम राहील', असे सांगताना तिवारी यांना अश्रू अनावर झाले. या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या इंजिनीअर सुरभी आणि मनीष पांडे यांच्या नातेवाईकांनीही हाच प्रश्न उपस्थित केला.
हवामान ढगाळ असल्यामुळे आणि विमानामध्येही तांत्रिक बिघाड असल्यामुळे गुरुवारी विमान चाचणी घेऊ नये, असे मारिया झुबेर यांनी स्पष्टपणे यू वाय एव्हिएशन कंपनीला सांगितले होते, तरीही जबरदस्तीने या चाचण्या का घेण्यात आल्या? असा संतप्त सवाल या विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमखी पडलेल्या वैमानिक मारिया व राजपूत यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला. त्यांच्या जिवापेक्षा नफा कमावणे अधिक महत्त्वाचे होते का, असा संतापही या कुटुंबीयांनी व्यक्त केला.
'मारिया यांना एक हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव होता. तरीही गुरुवारची विमान चाचणी करण्यासाठी त्या तयार नव्हत्या. तसे त्यांनी आपल्याला सांगितले होते. प्रदीप राजपूत यांनीही चाचणी न घेण्याची सूचना कंपनी व्यवस्थापनाला केली होती. मात्र, कंपनीने प्रदीप आणि मारियांनी दिलेल्या सूचना पाळल्या नाहीत', असे मारियांचे पती अॅड. प्रभात कथुरिया उद्वेगाने म्हणाले. कंपनीच्या हट्टामुळेच मारिया आणि इतरांचा घाटकोपरमधील दुर्घटनेत मृत्यू झाला असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
यू वाय कंपनीने आग्रह केल्यामुळे सकाळी आठ वाजता मारिया घरून निघाल्या. ही विमान चाचणी साधारणतः पावणे दोन तासांची असते. दोन तास झाले तरीही मारिया यांचा मेसेज न आल्यामुळे प्रभात यांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास 'तू कुठे आहेस?' असा मेसेज त्यांना पाठवला. मात्र, त्याचे उत्तर मिळाले नाही. त्याचवेळी काहीतरी विपरित घडले की काय, अशी शंका मनात आल्याचे प्रभात यांनी सांगितले. मेसेजला उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी एव्हीएशन कंपनीमध्ये फोन केला, तिथूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचवेळी टीव्हीवर ते विमान कोसळल्याचे कळले आणि प्रभात यांनी लगेचच राजावाडी रुग्णालयाकडे धाव घेतली. मारिया यांना पंधरा वर्षांची मुलगी आहे.
'त्यांचे ऋण कायम राहील'
या विमानाचे वैमानिक प्रदीप राजपूत हे दिल्लीचे रहिवासी होते. कांदिवली येथे राहणाऱ्या त्यांच्या भावोजींनी, एस. एस. तिवारी यांनीही 'राजपूत आणि मारिया यांनी त्या क्षणी घेतलेल्या निर्णय़ामुळे अनेकांचे प्राण वाचले', असे सांगितले. मात्र, ज्यांच्यामुळे ही दुर्घटना घडली त्यांना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी केली. 'प्रदीप यांना वीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता. स्वतःचा जीव गमावून त्यांनी शेकडो माणसांचे प्राण वाचवले. त्याचे ऋण कायम राहील', असे सांगताना तिवारी यांना अश्रू अनावर झाले. या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या इंजिनीअर सुरभी आणि मनीष पांडे यांच्या नातेवाईकांनीही हाच प्रश्न उपस्थित केला.