अ‍ॅपशहर

पितृपक्षामुळे बाणगंगेतल्या माशांवर संक्रांत

वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावात आज ३ ते ४ हजार मासे मृतावस्थेत आढळले. पितृपक्षातल्या पुजेच्या विधीमुळे तलावातले पाणी प्रदूषित होउन हे मासे मेले असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. पितृपक्षात होणाऱ्या विधींमुळे तलावात मोठ्या प्रमाणावर फुले, पीठ आणि अन्य साहित्याचा खच पडतो. परिणामी पाणी प्रदुषित होऊन तलावातल्या पाण्याचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, परिणामी ते माशांच्या जीवावर बेतते

Maharashtra Times 3 Oct 2016, 6:45 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pitru paksha rituals kill thousands of fish in banganga tank
पितृपक्षामुळे बाणगंगेतल्या माशांवर संक्रांत


वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावात आज ३ ते ४ हजार मासे मृतावस्थेत आढळले. पितृपक्षातल्या पुजेच्या विधीमुळे तलावातले पाणी प्रदूषित होउन हे मासे मेले असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.

पितृपक्षात होणाऱ्या विधींमुळे तलावात मोठ्या प्रमाणावर फुले, पीठ आणि अन्य साहित्याचा खच पडतो. परिणामी पाणी प्रदुषित होऊन तलावातल्या पाण्याचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, परिणामी ते माशांच्या जीवावर बेतते. काल रात्रीपासून हे मेलेले मासे काढून तलाव स्वच्छ करण्याकामी अनेक स्थानिक मदत करत आहेत, तर अनेकजण ते घरीही घेऊन जात आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज