अ‍ॅपशहर

पियूष गोयल यांनी राजीनामा द्यावा

परळ-एल्फिस्टन पुलावर आज झालेल्या भीषण दुर्घटनेची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त प्रवाश्यांनी केली आहे. ​​यावेळी संतप्त प्रवाश्यांनी 'रेल्वे मंत्री हाय हाय', 'भाजप सरकार हाय हाय' आणि 'पियूष गोयल राजीनामा द्या', अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसर आणि केईएम परिसर प्रवाश्यांच्या घोषणांनी दणाणून गेला होता.

Maharashtra Times 29 Sep 2017, 4:14 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम piyush goyal give resigns demands of people
पियूष गोयल यांनी राजीनामा द्यावा


परळ-एल्फिस्टन पुलावर आज झालेल्या भीषण दुर्घटनेची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त प्रवाश्यांनी केली आहे. ​​यावेळी संतप्त प्रवाश्यांनी 'रेल्वे मंत्री हाय हाय', 'भाजप सरकार हाय हाय' आणि 'पियूष गोयल राजीनामा द्या', अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसर आणि केईएम परिसर प्रवाश्यांच्या घोषणांनी दणाणून गेला होता.

परळ-एल्फिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ प्रवासी ठार झाले तर ३२ प्रवासी जखमी झाले. या घटनेनंतर प्रवाश्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. रोजच या गर्दीतून आम्हाला प्रवास करावा लागतो. रोजच आमचा मृत्यूशी सामना असतो. हा पुल आणि इथे होणारी गर्दी हे रेल्वेला आणि सरकारलाही माहीत आहे. पण तरीही सरकार त्याबद्दल गंभीर नाही. हा अपघात नसून ही प्रवाश्यांची सामुदायिक हत्याच आहे, त्यामुळे या घटनेची जबाबदारी घेऊन रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी प्रवासी करत आहेत. रेल्वेच्या भ्रष्ट कारभारामुळेच हा प्रकार घडल्याचंही काही प्रवाश्यांचं म्हणणं आहे. तर बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा आहे त्या रेल्वेची काळजी घ्या, असा संतापही प्रवाश्यांनी व्यक्त केला. ​लोकं मरतात. त्यानंतरच प्रशासनाला जाग येते. हा आपला देश आहे, अशी संतप्त प्रतिक्रियाही प्रवाश्यांनी व्यक्त केली. मृत आणि जखमींना केवळ प्रवाश्यांनीच दवाखान्यात नेले रेल्वेची अजिबात मदत मिळाली नाही, असंही प्रवाश्यांनी सांगितलं.

दरम्यान, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी त्यांचे मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते केईएममध्ये जखमी प्रवाशांची विचारपूस करण्यासाठी गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे स्थानीक आमदार सदा सरवणकर आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी केईएम रूग्णालयात जाऊन जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. या पुलाला ऐंशी वर्ष झालेली आहेत. इंग्रजांनी हा पुल बांधला होता. हा पुल तोडून पर्यायी व्यवस्था करण्याचे महाराष्ट्र शासनाला पत्रही आले होते. पण सरकारने काहीही केले नाही, असा आरोप सदा सरवणकर यांनी केला. समृद्धी सारखे मार्ग आम्ही करतोय. पण ज्याच्यामुळे महाराष्ट्राला समृद्धी मिळाली ते पुल मात्र जर्जर झाले आहेत. त्याकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नसल्याची टीकाही त्यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज