मुंबई: दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर महिन्याभरात बंदी लागू करण्यात येणार आहे. मात्र दुधाच्या पिशव्या पूर्णपणे बंद करण्यात येणार नाहीत, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत जाहीर केलं. दुधाची पिशवी घेतल्यानंतर रिकामी पिशवी आणून देणाऱ्या ग्राहकांना ५० पैसे परत देण्याची तयारी कंपन्यांनी दाखविली असल्याचंही कदम यांनी विधानसभेत स्पष्ट केलं.
राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही दुधाच्या प्लास्टिक पिशव्या सुरू कश्या? असा सवाल काही आमदारांनी विधानसभेत केला. त्याला उत्तर देताना रामदास कदम यांनी ही माहिती दिली. राज्यात दररोज १ कोटी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर येतात. त्यातून ३१ टन कचरा निर्माण होतो. त्यामुळेच येत्या महिन्याभरात दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार असल्याचं कदम म्हणाले.
राज्यात १२०० टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होत होता. मात्र प्लास्टिक बंदीनंतर यातील ६०० टन कचरा कमी झाला, असं त्यांनी सांगितलं. राज्यात १ लाख २० हजार २८६ टन प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. २४ कंपन्या दिवसाला ५५० टन प्लास्टिकवर प्रक्रिया करतात. सिमेंट कंपन्यांना ३ हजार टन प्लास्टिक वापरायला दिलं असल्याचंही ते म्हणाले.
बाहेर राज्यातून प्लास्टिक येतं
राज्यात सापडणारं प्लास्टिक बाहेर राज्यातून येतं. एकट्या गुजरातमधूनच राज्यात ८० टक्के प्लास्टिक येतं. ते बंद करण्यासाठी मी स्वत: गुजरातच्या सीमेवर जाऊन प्लास्टिक घेऊन येणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे, असंही कदम यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं.
राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही दुधाच्या प्लास्टिक पिशव्या सुरू कश्या? असा सवाल काही आमदारांनी विधानसभेत केला. त्याला उत्तर देताना रामदास कदम यांनी ही माहिती दिली. राज्यात दररोज १ कोटी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर येतात. त्यातून ३१ टन कचरा निर्माण होतो. त्यामुळेच येत्या महिन्याभरात दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार असल्याचं कदम म्हणाले.
राज्यात १२०० टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होत होता. मात्र प्लास्टिक बंदीनंतर यातील ६०० टन कचरा कमी झाला, असं त्यांनी सांगितलं. राज्यात १ लाख २० हजार २८६ टन प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. २४ कंपन्या दिवसाला ५५० टन प्लास्टिकवर प्रक्रिया करतात. सिमेंट कंपन्यांना ३ हजार टन प्लास्टिक वापरायला दिलं असल्याचंही ते म्हणाले.
बाहेर राज्यातून प्लास्टिक येतं
राज्यात सापडणारं प्लास्टिक बाहेर राज्यातून येतं. एकट्या गुजरातमधूनच राज्यात ८० टक्के प्लास्टिक येतं. ते बंद करण्यासाठी मी स्वत: गुजरातच्या सीमेवर जाऊन प्लास्टिक घेऊन येणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे, असंही कदम यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं.