म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
शिवाजी पार्क, माहीम, प्रभादेवी चौपाटीवर वाळूची जागा सध्या प्लास्टिकच्या पिशव्यांनी घेतली आहे. संपूर्ण चौपाटीवर दररोज प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच निर्माण होत आहे. समुद्राच्या भरतीसोबत किनाऱ्यावर प्लास्टिकच्या शेकडो टन पिशव्या आणि थर्माकोलचे तुकडे वाहून येत आहेत. त्यामुळे चौपाटीवरील पर्यावरण धोक्यात आले आहे.
दादरला चैत्यभूमीपासून हिंदुजा रुग्णालयापर्यंतची चौपाटी पूर्वीच नष्ट झाली आहे. किनाऱ्यावरील लाटांचा तडाखा थोपविण्यासाठी चैत्यभूमी परिसरात बोल्डर व टेट्रापॉड टाकले आहेत. त्यामुळे या भागातील वाळूचा किनारा केव्हाच नष्ट झाला आहे. मात्र इंदू मिलपासून पुढे प्रभादेवीपर्यंत अजूनही वाळूचा किनारा आहे. परंतु काही दिवसांपासून या भागात प्लास्टिकचा कचरा वाहून येण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वरळी ते माहीम खाडीपर्यंतच्या भौगोलिक रचनेमुळे या भागात समुद्रातील कचरा वाहून येण्याचे प्रमाण अधिक आहे. गणेश विसर्जनापासून या भागात प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये पाणी पिण्याचे ग्लास व प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांचा आणि देखाव्याच्या थर्माकोलचा प्रामुख्याने समावेश आहे. समुद्राला भरती आल्यावर हा कचरा वाहून किनाऱ्यावर येतो आणि वाळूत अडकतो. सूर्यवंशी क्षत्रिय हॉलपासून इंदू मिल, पुढे किर्ती महाविद्यालय आणि प्रभादेवीपर्यंत सर्वत्र प्लास्टिकचा कचराच दिसत आहे.
सकाळी सफाई दुपारी कचरा
या चौपाटीच्या सफाईचे काम कंत्राटदारामार्फत होते. दररोज सकाळी कंत्राटदाराची माणसे यांत्रिक गाळणीव्दारे चौपाटीची सफाई करतात. वाळूत रुतलेले प्लास्टिक हाताने बाहेर काढतात. परंतु समुद्राला भरती आल्यावर पुन्हा कचरा वाहून येतो. आम्ही कितीही साफसफाई केली तरी काहीच उपयोग होत नाही, असे कचरा उचलणारे कामगार सांगतात. या भागात केवळ किर्ती महाविद्यालयाच्या परिसरातील चौपाटीवर वाळूचा किनारा आहे. प्लास्टिकच्या भस्मासुराने चौपाटी गिळंकृत केल्याची खंत या भागातील रहिवासी विनायक पाटील यांनी व्यक्त केली.
मटा भूमिका
मुंबईतील सर्वच चौपाट्यांवर प्लास्टिकच्या पिशव्यांचे दुष्परिणाम दिसत आहेत. समुद्रात निर्माल्य टाकताना प्लास्टिकच्या पिशव्याही पाण्यात फेकून दिल्या जातात. गणेश विसर्जनासोबत देखाव्यांचेही विसर्जन होते. नाल्यात फेकलेला कचराही त्यात मिळतो. प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे मुंबईत पाणी कसे तुंबते, याचा अनुभव मुंबईकरांनी नुकताच घेतला आहे. प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांवर घातलेली बंदीही अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे.
शिवाजी पार्क, माहीम, प्रभादेवी चौपाटीवर वाळूची जागा सध्या प्लास्टिकच्या पिशव्यांनी घेतली आहे. संपूर्ण चौपाटीवर दररोज प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच निर्माण होत आहे. समुद्राच्या भरतीसोबत किनाऱ्यावर प्लास्टिकच्या शेकडो टन पिशव्या आणि थर्माकोलचे तुकडे वाहून येत आहेत. त्यामुळे चौपाटीवरील पर्यावरण धोक्यात आले आहे.
दादरला चैत्यभूमीपासून हिंदुजा रुग्णालयापर्यंतची चौपाटी पूर्वीच नष्ट झाली आहे. किनाऱ्यावरील लाटांचा तडाखा थोपविण्यासाठी चैत्यभूमी परिसरात बोल्डर व टेट्रापॉड टाकले आहेत. त्यामुळे या भागातील वाळूचा किनारा केव्हाच नष्ट झाला आहे. मात्र इंदू मिलपासून पुढे प्रभादेवीपर्यंत अजूनही वाळूचा किनारा आहे. परंतु काही दिवसांपासून या भागात प्लास्टिकचा कचरा वाहून येण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वरळी ते माहीम खाडीपर्यंतच्या भौगोलिक रचनेमुळे या भागात समुद्रातील कचरा वाहून येण्याचे प्रमाण अधिक आहे. गणेश विसर्जनापासून या भागात प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये पाणी पिण्याचे ग्लास व प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांचा आणि देखाव्याच्या थर्माकोलचा प्रामुख्याने समावेश आहे. समुद्राला भरती आल्यावर हा कचरा वाहून किनाऱ्यावर येतो आणि वाळूत अडकतो. सूर्यवंशी क्षत्रिय हॉलपासून इंदू मिल, पुढे किर्ती महाविद्यालय आणि प्रभादेवीपर्यंत सर्वत्र प्लास्टिकचा कचराच दिसत आहे.
सकाळी सफाई दुपारी कचरा
या चौपाटीच्या सफाईचे काम कंत्राटदारामार्फत होते. दररोज सकाळी कंत्राटदाराची माणसे यांत्रिक गाळणीव्दारे चौपाटीची सफाई करतात. वाळूत रुतलेले प्लास्टिक हाताने बाहेर काढतात. परंतु समुद्राला भरती आल्यावर पुन्हा कचरा वाहून येतो. आम्ही कितीही साफसफाई केली तरी काहीच उपयोग होत नाही, असे कचरा उचलणारे कामगार सांगतात. या भागात केवळ किर्ती महाविद्यालयाच्या परिसरातील चौपाटीवर वाळूचा किनारा आहे. प्लास्टिकच्या भस्मासुराने चौपाटी गिळंकृत केल्याची खंत या भागातील रहिवासी विनायक पाटील यांनी व्यक्त केली.
मटा भूमिका
मुंबईतील सर्वच चौपाट्यांवर प्लास्टिकच्या पिशव्यांचे दुष्परिणाम दिसत आहेत. समुद्रात निर्माल्य टाकताना प्लास्टिकच्या पिशव्याही पाण्यात फेकून दिल्या जातात. गणेश विसर्जनासोबत देखाव्यांचेही विसर्जन होते. नाल्यात फेकलेला कचराही त्यात मिळतो. प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे मुंबईत पाणी कसे तुंबते, याचा अनुभव मुंबईकरांनी नुकताच घेतला आहे. प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांवर घातलेली बंदीही अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे.