म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
दोन दशकांहून अधिक काळानंतर कॉलेजांच्या कॅम्पसमध्ये पुन्हा एकदा निवडणुकांचे वारे वाहणार असून, पुढील शैक्षणिक वर्षापासूनच त्याची सुरुवात होत आहे. त्याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. मात्र, निवडणुकांतून राजकारण हद्दपार करण्याचा भाग म्हणून उमेदवारांना राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थांचे बोधचिन्ह वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही प्रकारचे मेळावे किंवा मिरवणूक काढण्यासही मनाई करण्यात आली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कॉलेजांतील निवडणूक कार्यक्रमासह निवडणुकीसंदर्भातील आचारसंहिताही जाहीर केली आहे. विद्यापीठाने दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत या निवडणुकांचा सर्व कार्यक्रम पूर्ण करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. राज्यात महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, २०१६ लागू झाल्यानंतर कॉलेज आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुन्हा पूर्वीप्रमाणे खुल्या पद्धतीने होतील हे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यासंदर्भातील नियमावली सरकारतर्फे जाहीर होणे बाकी होते.
प्रचार खर्चालाही लगाम
वर्ग प्रतिनिधींच्या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास जास्तीत जास्त १००० रुपये आणि राखीव प्रवर्गाचा प्रतिनिधीच्या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास जास्तीत जास्त ५ हजार रुपयेच खर्च करता येणार आहे.
इतर नियम...
-निवडणूक उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्षे
-परीक्षा प्रक्रियेत किंवा कोणत्याही अपराधाकरिता दोषी ठरलेल्या विद्यार्थ्यांना निवडणूक लढविण्यास मनाई
-उमेदवारांनी पॅनेल तयार न करण्याची स्पष्ट सूचना
-विद्यार्थ्यांच्या गटांमधील मतभेद विकोपास जातील किंवा द्वेष, शत्रुत्व आणि तणाव निर्माण होईल, असे कृत्य करण्यास उमेदवारांना मनाई
दोन दशकांहून अधिक काळानंतर कॉलेजांच्या कॅम्पसमध्ये पुन्हा एकदा निवडणुकांचे वारे वाहणार असून, पुढील शैक्षणिक वर्षापासूनच त्याची सुरुवात होत आहे. त्याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. मात्र, निवडणुकांतून राजकारण हद्दपार करण्याचा भाग म्हणून उमेदवारांना राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थांचे बोधचिन्ह वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही प्रकारचे मेळावे किंवा मिरवणूक काढण्यासही मनाई करण्यात आली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कॉलेजांतील निवडणूक कार्यक्रमासह निवडणुकीसंदर्भातील आचारसंहिताही जाहीर केली आहे. विद्यापीठाने दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत या निवडणुकांचा सर्व कार्यक्रम पूर्ण करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. राज्यात महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, २०१६ लागू झाल्यानंतर कॉलेज आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुन्हा पूर्वीप्रमाणे खुल्या पद्धतीने होतील हे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यासंदर्भातील नियमावली सरकारतर्फे जाहीर होणे बाकी होते.
प्रचार खर्चालाही लगाम
वर्ग प्रतिनिधींच्या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास जास्तीत जास्त १००० रुपये आणि राखीव प्रवर्गाचा प्रतिनिधीच्या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास जास्तीत जास्त ५ हजार रुपयेच खर्च करता येणार आहे.
इतर नियम...
-निवडणूक उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्षे
-परीक्षा प्रक्रियेत किंवा कोणत्याही अपराधाकरिता दोषी ठरलेल्या विद्यार्थ्यांना निवडणूक लढविण्यास मनाई
-उमेदवारांनी पॅनेल तयार न करण्याची स्पष्ट सूचना
-विद्यार्थ्यांच्या गटांमधील मतभेद विकोपास जातील किंवा द्वेष, शत्रुत्व आणि तणाव निर्माण होईल, असे कृत्य करण्यास उमेदवारांना मनाई