नवी दिल्ली: सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) आपत्कालीन स्थितीत मुदतपूर्तीपूर्वीच, म्हणजे खाते उघडल्यापासून पाच वर्षांच्या आत काढून घेण्यास सरकार परवानगी देणार आहे. त्याचप्रमाणे, अल्पबचत योजनांचे खाते अज्ञान मुलांच्या नावे उघडण्यासही सरकार अनुमती देण्याचीही शक्यता आहे. यासाठी वित्त विधेयक,२०१८ मध्ये सुयोग्य बदल केले जाणार आहेत. मात्र, अल्पबचत योजनांची व्याजपद्धत व व्याजदर यांच्यात बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
मुदतपूर्तीपूर्वीच काढा पीपीएफ
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) आपत्कालीन स्थितीत मुदतपूर्तीपूर्वीच, म्हणजे खाते उघडल्यापासून पाच वर्षांच्या आत काढून घेण्यास सरकार परवानगी ...
Maharashtra Times 14 Feb 2018, 2:53 am