म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मंगळवारी झालेल्या आठ प्रभाग समित्यांच्या निवडणुकानंतर बुधवारी आणखी आठ समित्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत कुर्ला एल प्रभागात शिवसेना आणि राष्ट्रवादीने अचानक उमेदवारी अर्ज मागे घेऊन मनसेचा विजयाचा मार्ग मोकळा केला. मनसेचे पालिकेतील गटनेते दिलीप लांडे यांचा विजय आश्चर्यकारक मानला जात आहे.
दादर जी/उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदी माजी महापौर मिलिंद वैद्य, वांद्रे एच-पूर्व आणि एच-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे संजय अगलदरे, अंधेरी के-पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या उज्ज्वला मोडक अंधेरी के-पश्चिम प्रभाग समिती भाजपचे योगीराज दाभाडकर, चेंबूर एम-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपचे सुषम सावंत, घाटकोपर एन प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे तुकाराम पाटील, मुलुंड व भांडुप एस आणि टी प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या समिता कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.
कुर्ला एल प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्रविणा मोरजकर, मनसेचे दिलीप लांडे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. सईदा खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मोरजकर आणि डॉ. खान यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे लांडे यांचा विजय सुकर झाला.
मंगळवारी झालेल्या आठ प्रभाग समित्यांच्या निवडणुकानंतर बुधवारी आणखी आठ समित्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत कुर्ला एल प्रभागात शिवसेना आणि राष्ट्रवादीने अचानक उमेदवारी अर्ज मागे घेऊन मनसेचा विजयाचा मार्ग मोकळा केला. मनसेचे पालिकेतील गटनेते दिलीप लांडे यांचा विजय आश्चर्यकारक मानला जात आहे.
दादर जी/उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदी माजी महापौर मिलिंद वैद्य, वांद्रे एच-पूर्व आणि एच-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे संजय अगलदरे, अंधेरी के-पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या उज्ज्वला मोडक अंधेरी के-पश्चिम प्रभाग समिती भाजपचे योगीराज दाभाडकर, चेंबूर एम-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपचे सुषम सावंत, घाटकोपर एन प्रभाग समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे तुकाराम पाटील, मुलुंड व भांडुप एस आणि टी प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या समिता कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.
कुर्ला एल प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्रविणा मोरजकर, मनसेचे दिलीप लांडे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. सईदा खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मोरजकर आणि डॉ. खान यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे लांडे यांचा विजय सुकर झाला.