मुंबई : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर 'टिकली' वादावरुन चहुबाजूंनी टीकेची झोड उठलेली असताना प्रहारचे नेते तथा राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी मात्र संभाजी भिडे यांचं अप्रत्यक्ष समर्थन केलं आहे. जसं टिकली लावणं किंवा न लावणं हे महिला पत्रकाराचं स्वातंत्र्य आहे तसंच ते स्वातंत्र्य संभाजी भिडे यांनाही आहे, असं म्हणत एकप्रकारे त्यांनी संभाजी भिडे यांची कड घेतली आहे. त्याचमुळे आतापर्यंत पुरोगामी भूमिका घेणाऱ्या बच्चू कडूंची भिडेंवरील प्रतिक्रिया अचंबित करणारी असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधणारे संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला, आधी तू कुंकू लाव; मगच तुझ्याशी बोलेन अशी 'सूचना' केल्याने वाद उफाळला. परवापासून त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होतीये. आतापर्यंतची बच्चू कडू यांची राहिलेली पुरोगामी भूमिका पाहता ते या वादावर सडेतोड भाष्य करतील, अशी अपेक्षा होती. मात्र भिडे त्यांच्याजागी योग्य असल्याची टिप्पणी करत बदललेल्या नव्या भूमिकेचं बच्चू कडू यांनी दर्शन घडवलं. 'महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'चे संपादक अभिजीत कांबळे यांनी बच्चू कडू यांची विशेष मुलाखत घेतली. ते या मुलाखतीत बोलत होते.
"जसं महिला पत्रकाराला टिकली लावावी की नाही, हे स्वातंत्र्य आहे तसंच भिडेंनाही ते व्यक्तिस्वातंत्र्य आहे. माझा बाईट घेण्यासाठी एखादा पत्रकार आला आणि मी त्याला अमुक तमुक रंगाचा शर्ट घालून आला तरच मी बोलेन असं सांगितलं, तर माझ्या स्वातंत्र्याचा तो मुद्दा आहे.. हेच स्वातंत्र्य मग भिडेंनाही आहे", अशी मांडणी करत बच्चू कडू यांनी भिडे यांची कड घेण्याचा प्रयत्न केला.
तुम्ही मोठे नेते आहात, प्रगल्भ वैचारिक राजकारणी म्हणून तुमच्याकडे महाराष्ट्र पाहतो, तुम्हाला थेट प्रश्न आहे की त्यांची भूमिका योग्य होती की अयोग्य? असा थेट प्रश्न बच्चू कडू यांना पुन्हा विचारण्यात आला. त्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, "संभाजी भिडे यांची भूमिका योग्य की अयोग्य असं थेटपणे सांगता येणार नाही. पण मला असं म्हणायचं आहे की काही लोकांचा एक विशेष स्वभाव असतो. भलेही संभाजी भिडे यांचं म्हणणं समाजाला दिसायला चुकीचं दिसत असेल. पण त्यांच्या स्वभावाला ते चुकीचं वाटत नाही..."
"पण आपण अशा गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये किती लोकं बिचारे आजारी आहेत? किती लोकांना मदतीची गरज आहे? अशा विषयावर चर्चा करायला हवी. हे टिकली प्रकरण मला फार महत्त्वाचं वाटत नाही", असंही सांगायला बच्चू कडू विसरले नाहीत.
"जसं महिला पत्रकाराला टिकली लावावी की नाही, हे स्वातंत्र्य आहे तसंच भिडेंनाही ते व्यक्तिस्वातंत्र्य आहे. माझा बाईट घेण्यासाठी एखादा पत्रकार आला आणि मी त्याला अमुक तमुक रंगाचा शर्ट घालून आला तरच मी बोलेन असं सांगितलं, तर माझ्या स्वातंत्र्याचा तो मुद्दा आहे.. हेच स्वातंत्र्य मग भिडेंनाही आहे", अशी मांडणी करत बच्चू कडू यांनी भिडे यांची कड घेण्याचा प्रयत्न केला.
तुम्ही मोठे नेते आहात, प्रगल्भ वैचारिक राजकारणी म्हणून तुमच्याकडे महाराष्ट्र पाहतो, तुम्हाला थेट प्रश्न आहे की त्यांची भूमिका योग्य होती की अयोग्य? असा थेट प्रश्न बच्चू कडू यांना पुन्हा विचारण्यात आला. त्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, "संभाजी भिडे यांची भूमिका योग्य की अयोग्य असं थेटपणे सांगता येणार नाही. पण मला असं म्हणायचं आहे की काही लोकांचा एक विशेष स्वभाव असतो. भलेही संभाजी भिडे यांचं म्हणणं समाजाला दिसायला चुकीचं दिसत असेल. पण त्यांच्या स्वभावाला ते चुकीचं वाटत नाही..."
"पण आपण अशा गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये किती लोकं बिचारे आजारी आहेत? किती लोकांना मदतीची गरज आहे? अशा विषयावर चर्चा करायला हवी. हे टिकली प्रकरण मला फार महत्त्वाचं वाटत नाही", असंही सांगायला बच्चू कडू विसरले नाहीत.