म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मुंबईकरांना आरोग्याच्या चांगल्या सेवा देण्यास मुंबई महापालिका कूचकामी ठरल्याचा ठपका प्रजा फाऊंडेशनने महानगरातील आरोग्यस्थितीचा आढावा घेणाऱ्या अहवालात ठेवला आहे. मुंबईकरांना त्यांच्या उत्पन्नाच्या ९.१ टक्के म्हणजेच एकूण २४,७६६ कोटी रुपये खर्च रुग्णालये तसेच वैद्यकीय उपचारांवर करावा लागल्याचा निष्कर्ष यामध्ये काढण्यात आला आहे.
प्रजा फाऊंडेशनने हंसा रिसर्चच्या माध्यमातून केलेले सर्वेक्षण आणि माहितीच्या अधिकाराद्वारे मिळालेल्या बाबींनुसार हा अहवाल तयार केला आहे. २६ पालिका रुग्णालयांमध्ये ३९ टक्के तर, मुंबईतील राज्य सरकारच्या पाच रुग्णालयांमध्ये ५९ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ९८ टक्के वाढ झाली असून, ही संख्या ७२६१वरून १४,३५४ झाली आहे. चार वर्षांत क्षयरोगाच्या संख्येतही ३३ टक्के वाढ झाली आहे. २०१३-१४मध्ये ४१,४७९ क्षयरुग्ण होते, २०१७-१८मध्ये ही संख्या ५५ हजार १३० झाली आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
डेंग्यू, क्षयरुग्णांत वाढ
सन २०१३-१४मध्ये क्षयरोगाचे ४१ हजार ४७९ रुग्ण आढळले. २०१७-१८मध्ये त्यामध्ये ५५ हजार १३०पर्यंत वाढ झाली. गेल्या वर्षी क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण कुर्ल्यामध्ये ७९२, सांताक्रूझमध्ये ६१४ व भांडुपमध्ये ४९६ होते. डेंग्यूच्या रुग्णांतही गेल्या पाच वर्षांत वाढ दिसून आली. गेल्या वर्षी डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण अंधेरी पूर्वमध्ये १८४, दहिसर पश्चिमेत १०९ आणि वांद्रे येथे ७३ इतके आढळले आहेत. मात्र वर्षभरात अंधेरी पूर्व, चेंबूर आणि घाटकोपर भागात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळला नाही. तर 'प्रजा'ने घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात मलेरियाचे १ लाख १५ हजार २६८ तर, डेंग्यूचे १ लाख २१ हजार ७७५ रुग्ण आढळले आहेत.
पालिका रुग्णालयात आरोग्यसुविधा असतात. त्यांची गुणवत्ताही चांगली असते, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मात्र संसर्गजन्य रोगांचा बिमोड करण्यासाठी पुरेशी सरकारी योजना आणि धोरणे दिसून येत नाही. शहराचे आरोग्य ढासळू लागले आहे. - मिलिंद म्हस्के, संचालक, प्रजा फाऊंडेशन
मुंबईकरांना आरोग्याच्या चांगल्या सेवा देण्यास मुंबई महापालिका कूचकामी ठरल्याचा ठपका प्रजा फाऊंडेशनने महानगरातील आरोग्यस्थितीचा आढावा घेणाऱ्या अहवालात ठेवला आहे. मुंबईकरांना त्यांच्या उत्पन्नाच्या ९.१ टक्के म्हणजेच एकूण २४,७६६ कोटी रुपये खर्च रुग्णालये तसेच वैद्यकीय उपचारांवर करावा लागल्याचा निष्कर्ष यामध्ये काढण्यात आला आहे.
प्रजा फाऊंडेशनने हंसा रिसर्चच्या माध्यमातून केलेले सर्वेक्षण आणि माहितीच्या अधिकाराद्वारे मिळालेल्या बाबींनुसार हा अहवाल तयार केला आहे. २६ पालिका रुग्णालयांमध्ये ३९ टक्के तर, मुंबईतील राज्य सरकारच्या पाच रुग्णालयांमध्ये ५९ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ९८ टक्के वाढ झाली असून, ही संख्या ७२६१वरून १४,३५४ झाली आहे. चार वर्षांत क्षयरोगाच्या संख्येतही ३३ टक्के वाढ झाली आहे. २०१३-१४मध्ये ४१,४७९ क्षयरुग्ण होते, २०१७-१८मध्ये ही संख्या ५५ हजार १३० झाली आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
डेंग्यू, क्षयरुग्णांत वाढ
सन २०१३-१४मध्ये क्षयरोगाचे ४१ हजार ४७९ रुग्ण आढळले. २०१७-१८मध्ये त्यामध्ये ५५ हजार १३०पर्यंत वाढ झाली. गेल्या वर्षी क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण कुर्ल्यामध्ये ७९२, सांताक्रूझमध्ये ६१४ व भांडुपमध्ये ४९६ होते. डेंग्यूच्या रुग्णांतही गेल्या पाच वर्षांत वाढ दिसून आली. गेल्या वर्षी डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण अंधेरी पूर्वमध्ये १८४, दहिसर पश्चिमेत १०९ आणि वांद्रे येथे ७३ इतके आढळले आहेत. मात्र वर्षभरात अंधेरी पूर्व, चेंबूर आणि घाटकोपर भागात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळला नाही. तर 'प्रजा'ने घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात मलेरियाचे १ लाख १५ हजार २६८ तर, डेंग्यूचे १ लाख २१ हजार ७७५ रुग्ण आढळले आहेत.
पालिका रुग्णालयात आरोग्यसुविधा असतात. त्यांची गुणवत्ताही चांगली असते, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मात्र संसर्गजन्य रोगांचा बिमोड करण्यासाठी पुरेशी सरकारी योजना आणि धोरणे दिसून येत नाही. शहराचे आरोग्य ढासळू लागले आहे. - मिलिंद म्हस्के, संचालक, प्रजा फाऊंडेशन