अ‍ॅपशहर

संभाजी भिडेंना मोदींची फूस, आंबेडकरांचा आरोप

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाला जबाबदार असलेले संभाजी भिडे गुरुजी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फूस असल्यानेच त्यांना अटक होत नसल्याचा गंभीर आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान, भिडे गुरुजींना आठ दिवसांत अटक करण्याचा अल्टिमेटमही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Mar 2018, 7:33 pm
मुंबई: कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाला जबाबदार असलेले संभाजी भिडे गुरुजी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फूस असल्यानेच त्यांना अटक होत नसल्याचा गंभीर आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान, भिडे गुरुजींना आठ दिवसांत अटक करण्याचा अल्टिमेटमही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prakash ambedkar attacks on modi
संभाजी भिडेंना मोदींची फूस, आंबेडकरांचा आरोप


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतल्यानंतर आझाद मैदानावरील 'एल्गार मोर्चा'ला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर यांनी हा आरोप केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिटलरशी तुलना करत त्यांचा ऐकेरी उल्लेख केला. 'हिटलर कुणाचंच ऐकत नव्हता. तो मनमानी करत होता. त्यामुळे शेवटी त्यालाही स्वत:ला गोळ्या घालून संपवावं लागलं. पंतप्रधान मोदी सुद्धा मनमानी करत आहेत. मंत्र्यांना कैद्यासारखी वागणूक देत आहेत. कैद्यासारखी वागणूक मिळत असल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अवघ्या दीड महिन्यातच मंत्रिमंडळातून बाहेर पडले,' असं सांगतानाच 'आम्ही तुमचे कैदी होणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, फडणवीस यांच्याशी मंत्रालयात बैठक झाली असून त्यात संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. भिडे गुरुजींना आठ दिवसात अटक करण्याची डेडलाइनही फडणवीस सरकारला देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच भिडे यांच्याविरोधातील पुरावे मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज