मुंबई: आपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुक्तांची बदली हा मार्ग नव्हे, गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासन आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे जे चित्र आहे, आजची बदली हा त्याचाच परिपाक आहे, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या बदलीवरून टीकास्त्र सोडले.
प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली; इक्बाल चहल मुंबई पालिकेचे नवे आयुक्त
करोना साथ रोखण्याच्या दृष्टीने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याची बाब कालच्या व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली. अजोय मेहता व प्रवीण परेदशी यांच्यामधील शितयुद्धाचा अंत झाला आहे की, मध्यंतर झाला आहे याची मला कल्पना नाही पण या निमित्ताने प्रशासनातील समन्वयाचा अभाव उघड झाला आहे, असा दावा दरेकर यांनी केला.
करोनाची धास्ती! नवी मुंबईतील APMC मार्केट ११ मे पासून पूर्ण बंद
प्रशासन व सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य व्यवस्था कमकुवत झाली आहे. ज्यावेळी आपत्तीजनक परिस्थिती असते त्यावेळी सरकारी अधिकाऱ्यांची बदली करण्याची परंपरा राज्यात नाही. करोनाच्या परिस्थितीत मंत्रालय व महापालिका आयुक्त स्तरावर घेतलेल्या निर्णयामुळे यामध्ये मतभेद निर्माण झाले. त्यामुळे या करोनाच्या संकटमय परिस्थितीत सरकार व प्रशासन यामधील अंतर्गत विसंवाद उघड झाला असल्याची टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली.
मुंबईत लष्कराची गरज नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका: मुख्यमंत्री ठाकरे
प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली; इक्बाल चहल मुंबई पालिकेचे नवे आयुक्त
करोना साथ रोखण्याच्या दृष्टीने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याची बाब कालच्या व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली. अजोय मेहता व प्रवीण परेदशी यांच्यामधील शितयुद्धाचा अंत झाला आहे की, मध्यंतर झाला आहे याची मला कल्पना नाही पण या निमित्ताने प्रशासनातील समन्वयाचा अभाव उघड झाला आहे, असा दावा दरेकर यांनी केला.
करोनाची धास्ती! नवी मुंबईतील APMC मार्केट ११ मे पासून पूर्ण बंद
प्रशासन व सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य व्यवस्था कमकुवत झाली आहे. ज्यावेळी आपत्तीजनक परिस्थिती असते त्यावेळी सरकारी अधिकाऱ्यांची बदली करण्याची परंपरा राज्यात नाही. करोनाच्या परिस्थितीत मंत्रालय व महापालिका आयुक्त स्तरावर घेतलेल्या निर्णयामुळे यामध्ये मतभेद निर्माण झाले. त्यामुळे या करोनाच्या संकटमय परिस्थितीत सरकार व प्रशासन यामधील अंतर्गत विसंवाद उघड झाला असल्याची टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली.
मुंबईत लष्कराची गरज नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका: मुख्यमंत्री ठाकरे