मुंबई : दिवाळीच्या सणावरही महागाईचे सावट असून, रेडिमेड फराळही त्यातून सुटलेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत पदार्थांच्या दरात पाच ते आठ टक्क्यांची वाढ दरामध्ये झाली आहे. तेल, डाळी, तूप, साखर अशा सर्व जिन्नसांच्या किंमती वाढल्यामुळे फराळाच्या दरांमध्ये वाढ करावी लागणार असल्याचे फराळ तयार करणाऱ्यांकडून सांगण्यात येते.
दसरा झाला की रेडिमेड फराळ तयार करणारे महिलांचे बचतगट, संस्था तसेच घरगुती लघुउद्योजकांकडून हा फराळ तयार करण्यासाठी लगबग सुरू होते. या फराळाला महागाईचा चांगलाच चटका बसला आहे. महागाईमुळे विविध जिन्नसांच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनीही ही परिस्थिती लक्षात घेऊन दरात सवलतीची अपेक्षा करू नये, असे फराळविक्रेत्यांचे म्हणणे आहे.
यंदा मोतीचूर लाडू आठशे ते नऊशे रुपये किलो, तर सुक्या मेव्याचे लाडू १,५०० ते १,६०० रुपये किलो दराने मिळत आहेत. रवा, रवा नारळ, रवा बेसन, बेसन लाडू सुमारे पाचशे ते सहाशे रुपये किलो आहेत. चिवडा ४०० ते ४५० रुपये आहे. सर्वांची आवडती चकली पाचशे ते साडेपाचशे रुपये किलोने मिळते आहे. गोडे शंकरपाळे ४५० रुपये, खारे शंकरपाळे ३५० ते ४५० रुपये, साधी शेव ३५० रुपये तर लसूण शेवही ३५० रुपये किलो असा दर आहे. सुक्या खोबऱ्याच्या सारणाची करंजी ३२ ते ३५ रुपये प्रति नग तर अनारसे ३० रुपये नग असे सर्वसाधारणपणे किंमतीचे चित्र आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात वाढ झाली आहे.
मोहनी नरवणे मागील दहा ते अकरा वर्षांपासून फराळाच्या ऑर्डर्स घेतात. त्या म्हणाल्या, की ‘प्रत्येक वर्षी महागाईमध्ये वाढ होते. जिन्नसांच्या किंमतीमध्ये चढ-उतार होतात. यंदा मात्र ही वाढ अधिक आहे. ग्राहक तुटू नये यासाठी मामुली दरवाढ करतानाही चारवेळा विचार करावा लागतो. करोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या काळात दिवाळीचा जल्लोष नव्हता. मागील दोन वर्षांच्या तुलनेत महागाईच्या झळा अधिक बसत आहे. त्यामुळे यंदा आधीच्या दरांमध्ये फराळ देणे शक्य होणार नाही.’
मनुष्यबळाची मिळणे अवघड
पूर्वी हे काम करण्यासाठी मनुष्यबळ सहज उपलब्ध होत होते. पण आता हवी तशी माणसे मिळत नाहीत. कारण सणासुदीच्या काळातील कामापेक्षा पूर्णवेळ काम करण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यात सुरक्षित उत्पन्नाची हमी असते. त्यामुळे मनुष्यबळाची उपलब्धतेची अडचण असल्याचे मनीषा पवार यांनी सांगितले. फक्त दिवाळीच्या फराळाची उपलब्धता करणाऱ्या काही विक्रेत्यांनी ठराविक पदार्थच विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
पदार्थ दर (रुपये प्रति किलो)Ḥ
रवा, रवा-नारळ, ५०० ते ६००
बेसन लाडू
गोडे शंकरपाळे ४५०
खारे शंकरपाळे ३५० ते ४५०
साधी शेव ३५०
चिवडा ४०० ते ४५०
करंजी ३२ ते ३५ प्रति नग
अनारसे ३० रुपये प्रतिनग
दसरा झाला की रेडिमेड फराळ तयार करणारे महिलांचे बचतगट, संस्था तसेच घरगुती लघुउद्योजकांकडून हा फराळ तयार करण्यासाठी लगबग सुरू होते. या फराळाला महागाईचा चांगलाच चटका बसला आहे. महागाईमुळे विविध जिन्नसांच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनीही ही परिस्थिती लक्षात घेऊन दरात सवलतीची अपेक्षा करू नये, असे फराळविक्रेत्यांचे म्हणणे आहे.
यंदा मोतीचूर लाडू आठशे ते नऊशे रुपये किलो, तर सुक्या मेव्याचे लाडू १,५०० ते १,६०० रुपये किलो दराने मिळत आहेत. रवा, रवा नारळ, रवा बेसन, बेसन लाडू सुमारे पाचशे ते सहाशे रुपये किलो आहेत. चिवडा ४०० ते ४५० रुपये आहे. सर्वांची आवडती चकली पाचशे ते साडेपाचशे रुपये किलोने मिळते आहे. गोडे शंकरपाळे ४५० रुपये, खारे शंकरपाळे ३५० ते ४५० रुपये, साधी शेव ३५० रुपये तर लसूण शेवही ३५० रुपये किलो असा दर आहे. सुक्या खोबऱ्याच्या सारणाची करंजी ३२ ते ३५ रुपये प्रति नग तर अनारसे ३० रुपये नग असे सर्वसाधारणपणे किंमतीचे चित्र आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात वाढ झाली आहे.
मोहनी नरवणे मागील दहा ते अकरा वर्षांपासून फराळाच्या ऑर्डर्स घेतात. त्या म्हणाल्या, की ‘प्रत्येक वर्षी महागाईमध्ये वाढ होते. जिन्नसांच्या किंमतीमध्ये चढ-उतार होतात. यंदा मात्र ही वाढ अधिक आहे. ग्राहक तुटू नये यासाठी मामुली दरवाढ करतानाही चारवेळा विचार करावा लागतो. करोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या काळात दिवाळीचा जल्लोष नव्हता. मागील दोन वर्षांच्या तुलनेत महागाईच्या झळा अधिक बसत आहे. त्यामुळे यंदा आधीच्या दरांमध्ये फराळ देणे शक्य होणार नाही.’
मनुष्यबळाची मिळणे अवघड
पूर्वी हे काम करण्यासाठी मनुष्यबळ सहज उपलब्ध होत होते. पण आता हवी तशी माणसे मिळत नाहीत. कारण सणासुदीच्या काळातील कामापेक्षा पूर्णवेळ काम करण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यात सुरक्षित उत्पन्नाची हमी असते. त्यामुळे मनुष्यबळाची उपलब्धतेची अडचण असल्याचे मनीषा पवार यांनी सांगितले. फक्त दिवाळीच्या फराळाची उपलब्धता करणाऱ्या काही विक्रेत्यांनी ठराविक पदार्थच विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
पदार्थ दर (रुपये प्रति किलो)Ḥ
रवा, रवा-नारळ, ५०० ते ६००
बेसन लाडू
गोडे शंकरपाळे ४५०
खारे शंकरपाळे ३५० ते ४५०
साधी शेव ३५०
चिवडा ४०० ते ४५०
करंजी ३२ ते ३५ प्रति नग
अनारसे ३० रुपये प्रतिनग