म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरू असतानाच, अचानक राज्यातील २२१ नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेसोबत युती करण्याची घोषणा केल्यामुळे शिवसेनेवर आरोप करणारे भाजपचे नेते बुचकळ्यात पडले आहेत. तसेच शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छुक नसलेल्या भाजपमधील गटांमध्ये यामुळे कुरबूरही सुरू झाली आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे सुरुवातीला शिवसेना आणि भाजपतर्फे सांगितले जात होते. तशी तयारीही दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी सुरू केली होती. स्वबळावर लढले तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळते. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप असे दोन्ही पक्ष वेगळे लढले होते त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना तशी संधी विधानसभा निवडणुकीत मिळाली होती. नगरपालिका आणि फेब्रुवारीत होणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना पक्षाच्या मेळाव्यात सांगितले होते.
पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावर शिवसेनेवर टीका केली होती. या नेत्यांनाही शिवसेनेशी युती नको होती. त्यांचा कल मनसेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात वातावरण तयार करण्यात आले. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे भाजपच्या या नेत्यांनी उजेडात आणली. शिवसेनेचे माफियाराज मुंबई महापालिकेत सुरू आहे, अशा टोकाची टीका केली गेली. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यंकर्त्यांमध्ये या नेत्यांबद्दल कमालीचा संताप आहे. मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत युती झाली तर या नेत्यांसाठी धोक्याची घंटा आहे, असे भाजपच्या गोटात बोलले जात आहे. मुंबई, ठाणे महापालिकेतही युती होईल, असे भाजपचे नेते सांगत आहेत. मात्र त्याचा फटका पक्षाच्या काही नेत्यांना बसणार आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरू असतानाच, अचानक राज्यातील २२१ नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेसोबत युती करण्याची घोषणा केल्यामुळे शिवसेनेवर आरोप करणारे भाजपचे नेते बुचकळ्यात पडले आहेत. तसेच शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छुक नसलेल्या भाजपमधील गटांमध्ये यामुळे कुरबूरही सुरू झाली आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे सुरुवातीला शिवसेना आणि भाजपतर्फे सांगितले जात होते. तशी तयारीही दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी सुरू केली होती. स्वबळावर लढले तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळते. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप असे दोन्ही पक्ष वेगळे लढले होते त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना तशी संधी विधानसभा निवडणुकीत मिळाली होती. नगरपालिका आणि फेब्रुवारीत होणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना पक्षाच्या मेळाव्यात सांगितले होते.
पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावर शिवसेनेवर टीका केली होती. या नेत्यांनाही शिवसेनेशी युती नको होती. त्यांचा कल मनसेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात वातावरण तयार करण्यात आले. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे भाजपच्या या नेत्यांनी उजेडात आणली. शिवसेनेचे माफियाराज मुंबई महापालिकेत सुरू आहे, अशा टोकाची टीका केली गेली. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यंकर्त्यांमध्ये या नेत्यांबद्दल कमालीचा संताप आहे. मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत युती झाली तर या नेत्यांसाठी धोक्याची घंटा आहे, असे भाजपच्या गोटात बोलले जात आहे. मुंबई, ठाणे महापालिकेतही युती होईल, असे भाजपचे नेते सांगत आहेत. मात्र त्याचा फटका पक्षाच्या काही नेत्यांना बसणार आहे.