म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मध्य रेल्वेवरील गोंधळाची परंपरा गुरुवारीही कायम राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले. सकाळी ६.३० च्या सुमारास ठाण्याहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या एका धीम्या लोकलमध्ये विक्रोळी येथे तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. या बिघाडामुळे दिवसभरात पाच फेऱ्या रद्द झाल्या तर अनेक फेऱ्या उशिराने धावत होत्या.
बिघाड झालेल्या एका लोकलमागे आणखी चार लोकल रांगेत उभ्या राहिल्या होत्या. या लोकलमधील बिघाड दुरुस्त झाल्यानंतर सेवा हळूहळू पूर्ववत झाली. मात्र, तोपर्यंत सर्वच स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून मध्य, हार्बर रेल्वेवर विविध कारणांमुळे बिघाड होत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत वाढ होत आहे.
मध्य रेल्वेवरील गोंधळाची परंपरा गुरुवारीही कायम राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले. सकाळी ६.३० च्या सुमारास ठाण्याहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या एका धीम्या लोकलमध्ये विक्रोळी येथे तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. या बिघाडामुळे दिवसभरात पाच फेऱ्या रद्द झाल्या तर अनेक फेऱ्या उशिराने धावत होत्या.
बिघाड झालेल्या एका लोकलमागे आणखी चार लोकल रांगेत उभ्या राहिल्या होत्या. या लोकलमधील बिघाड दुरुस्त झाल्यानंतर सेवा हळूहळू पूर्ववत झाली. मात्र, तोपर्यंत सर्वच स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून मध्य, हार्बर रेल्वेवर विविध कारणांमुळे बिघाड होत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत वाढ होत आहे.