अ‍ॅपशहर

वाढीव मार्गिकांचा प्रस्ताव

कल्याण, आसनगाव, बदलापूरमधील प्रवाशांना लवकरच खूशखबर मिळणार आहे. लांबचा प्रवास करताना प्रचंड गर्दी, कमी फेऱ्यांना तोंड देणाऱ्या या प्रवाशांसाठी दोन नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. कल्याण ते आसनगावपर्यंत चौथी मार्गिका आणि कल्याण ते बदलापूरपर्यंत तिसरी-चौथी मार्गिका हे प्रकल्प आखण्यात आले आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) त्यात स्वारस्य दाखवले आहे.

Maharashtra Times 13 Dec 2017, 4:54 am
कल्याणपुढील प्रवाशांना खूषखबर मिळण्याची चिन्हे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम proposal of extra routes on central railway
वाढीव मार्गिकांचा प्रस्ताव

कल्याण-आसनगावदरम्यान चौथी मार्गिका कल्याण-बदलापूरदरम्यान तिसरी-चौथी मार्गिका मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा पुढाकार

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

कल्याण, आसनगाव, बदलापूरमधील प्रवाशांना लवकरच खूशखबर मिळणार आहे. लांबचा प्रवास करताना प्रचंड गर्दी, कमी फेऱ्यांना तोंड देणाऱ्या या प्रवाशांसाठी दोन नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. कल्याण ते आसनगावपर्यंत चौथी मार्गिका आणि कल्याण ते बदलापूरपर्यंत तिसरी-चौथी मार्गिका हे प्रकल्प आखण्यात आले आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) त्यात स्वारस्य दाखवले आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याणपुढील लोकलसेवा अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे विस्कळीत होते. पश्चिम रेल्वेवरील विरारपर्यंत वाढलेल्या लोकवस्तीप्रमाणेच कल्याण-आसनगाव, कल्याण-बदलापूर पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर प्रवासीसंख्या वाढत आहे. हा ताण कमी करण्यासाठी नव्या प्रकल्पांची जोड देण्याचा विचार सुरू आहे.

कल्याण ते बदलापूरमध्ये दोन मार्गिका असून त्यावरून लोकलसह मेल/एक्स्प्रेसची वाहतूक होते. त्यामुळे लोकलसाठी तिसरी आणि चौथी मार्गिका उभारल्यास ती अतिशय उपयुक्त ठरेल, असे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणेच कल्याण ते आसनगावपर्यंत तिसरी मार्गिका बांधण्याचे काम सुरू असून त्यास चौथ्या मार्गिकेची जोड देण्यावर भर दिला जात आहे.

कल्याण ते आसनगावपर्यंत चौथी मार्गिका आणि कल्याण ते बदलापूरपर्यंत तिसरी आणि चौथी मार्गिका उभारल्याने लाखो प्रवाशांना फायदा होणे अपेक्षित आहे. याबाबत महामंडळाकडून सर्वेक्षण केले जाणार असून त्यातून त्याची व्यवहार्यता तपासून पाहिली जाणार आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत महामंडळ व पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत या प्रस्तावांवर चर्चा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पाबाबत रेल्वे बोर्डाकडे दीड ते दोन महिन्यांत प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज