कुलगुरू निवडीवर प्रश्न
मुंबई विद्यापीठाचा कारभार सुधारण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमांनुसारच कुलगुरू निवडा, अशी आग्रही मागणी विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. ए. डी. सावंत यांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच कुलगुरू निवडीसाठी गठीत केल्या जाणाऱ्या शोध समितीतील अधिकारी सक्षम नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
Maharashtra Times 13 Nov 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबई विद्यापीठाचा कारभार सुधारण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमांनुसारच कुलगुरू निवडा, अशी आग्रही मागणी विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. ए. डी. सावंत यांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच कुलगुरू निवडीसाठी गठीत केल्या जाणाऱ्या शोध समितीतील अधिकारी सक्षम नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून दूर केल्यानंतर आता सर्वांचे लक्ष नव्या कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेकडे लागले आहे. यासाठी शोध समिती गठीत करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच सावंत यांनी याप्रश्नी थेट राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निवेदन सादर केले आहे. कुलगुरूपदाच्या निवडीप्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि नियमांची पूर्तता व्हावी, यासाठी सावंत यांनी हे तीन पानी पत्र लिहिले आहे. कुलगुरूंची निवड करताना यूजीसीचे नियम पाळणे बंधनकारक असतानाही ते पाळले जात नाहीत. तसेच या पदासाठीची पात्रता गांभीर्याने पाहिली जात नाही. कुलगुरूंची निवड करताना त्यांच्या शोधपत्रांचा विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी या निवेदनात अधोरेखित केले आहे. विद्यापीठात प्राध्यापक भरती यूजीसीच्या नियमानुसारच करावी लागते, मात्र कुलगुरूसाठी वेगळा पर्याय शोधण्यात येत असल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सावंत यांच्या या निवेदनाबाबत राज्यपाल कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शोध समितीवर आक्षेप
शोध समितीतील सदस्यांच्या निवडीवरही सावंत यांनी आक्षेप नोंदवला आहे. विद्यापीठाच्या कामकाजाची माहिती नसलेल्या व्यक्ती या समितीवर घेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या नामांकित सदस्यांकडून व विद्यापीठ कारभाराची प्रशासकीय माहिती असलेल्यांकडूनच उच्च पदस्थकडून कुलगुरूंची निवड झाली पाहिजे. मात्र तसे होत नाही असा आरोप त्यांनी केला आहे.
मुंबई विद्यापीठाचा कारभार सुधारण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमांनुसारच कुलगुरू निवडा, अशी आग्रही मागणी विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. ए. डी. सावंत यांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच कुलगुरू निवडीसाठी गठीत केल्या जाणाऱ्या शोध समितीतील अधिकारी सक्षम नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून दूर केल्यानंतर आता सर्वांचे लक्ष नव्या कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेकडे लागले आहे. यासाठी शोध समिती गठीत करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच सावंत यांनी याप्रश्नी थेट राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निवेदन सादर केले आहे. कुलगुरूपदाच्या निवडीप्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि नियमांची पूर्तता व्हावी, यासाठी सावंत यांनी हे तीन पानी पत्र लिहिले आहे. कुलगुरूंची निवड करताना यूजीसीचे नियम पाळणे बंधनकारक असतानाही ते पाळले जात नाहीत. तसेच या पदासाठीची पात्रता गांभीर्याने पाहिली जात नाही. कुलगुरूंची निवड करताना त्यांच्या शोधपत्रांचा विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी या निवेदनात अधोरेखित केले आहे. विद्यापीठात प्राध्यापक भरती यूजीसीच्या नियमानुसारच करावी लागते, मात्र कुलगुरूसाठी वेगळा पर्याय शोधण्यात येत असल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सावंत यांच्या या निवेदनाबाबत राज्यपाल कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शोध समितीवर आक्षेप
शोध समितीतील सदस्यांच्या निवडीवरही सावंत यांनी आक्षेप नोंदवला आहे. विद्यापीठाच्या कामकाजाची माहिती नसलेल्या व्यक्ती या समितीवर घेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या नामांकित सदस्यांकडून व विद्यापीठ कारभाराची प्रशासकीय माहिती असलेल्यांकडूनच उच्च पदस्थकडून कुलगुरूंची निवड झाली पाहिजे. मात्र तसे होत नाही असा आरोप त्यांनी केला आहे.