अ‍ॅपशहर

मराठ्यांचा झंझावात! मुंबईत १ कोटीचा मोर्चा

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठमोठे मोर्चे काढून सरकारसह सर्वच राजकीय पक्षांना धडकी भरवणाऱ्या मराठा समाजाने आता मुंबईत एक कोटींचा मोर्चा काढून अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन करण्याचा संकल्प सोडला आहे. मंगळवारी मोठ्या मराठा नेत्यांच्या एका उच्चस्तरीय बैठकीत या प्रस्तावित मोर्चासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

Maharashtra Times 22 Sep 2016, 2:47 pm
प्रफुल्ल मारपकवार। मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम quota march 1 crore marathas to storm mumbai
मराठ्यांचा झंझावात! मुंबईत १ कोटीचा मोर्चा


राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठमोठे मोर्चे काढून सरकारसह सर्वच राजकीय पक्षांना धडकी भरवणाऱ्या मराठा समाजाने आता मुंबईत एक कोटींचा मोर्चा काढून अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन करण्याचा संकल्प सोडला आहे. मंगळवारी मोठ्या मराठा नेत्यांच्या एका उच्चस्तरीय बैठकीत या प्रस्तावित मोर्चासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

बैठकीत आखण्यात आलेल्या या कृती कार्यक्रमानुसारच राज्यातील विविध भागांतून एक कोटी मराठ्यांना मुंबईत आणण्याची रणनीती आखण्यात येत आहे.

या संकल्पाबाबत अधिक माहिती देताना एक वरीष्ठ मराठा अधिकारी म्हणाला, की हा मोर्चा नेमका कधी काढावा याबाबत अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु, हा मोर्चा दिवाळीपूर्वी केव्हाही आयोजित केला जावू शकतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या मागण्या मान्य करुन आपला निर्णय जाहीर करतील अशी आम्हाला आशा आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.

काल बुधवारी नवी मुंबई आणि सोलापूरात मराठा समाजाने मोठे मोर्चे काढले. या दोन्ही ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने लोक येतील असे आम्हाला वाटत नसल्याचेही हा अधिकारी म्हणाला. गेल्या अनेक दशकांपासून मराठा समाजावर अन्याय होत असून या परिस्थितीमुळे मराठा नाराज आहे हेच संकेत मोर्चातील गर्दी पाहून मिळतात, असेही तो अधिकारी पुढे म्हणाला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील मराठा समाजाच्या मागण्यांचे समर्थन केले आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या मराठा समाजाच्या मागण्यांबाबत मत व्यक्त करताना म्हणाले, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं ही मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज