अ‍ॅपशहर

26/11 Attack: सागरी प्रदेशावर रडार वॉच

भारतीय समुद्र किनारे आणि महासागर यांच्यावर सध्या ४६ रडार वॉच ठेवून आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी ३८ रडार बसविले जाणार आहेत. त्यामुळे एकूण ८४ रडार समुद्री सुरक्षेसाठी सज्ज होणार आहेत. तर, तिसऱ्या टप्प्यात आणखी काही रडार बसविण्यात येणार असल्याने भारतीय सागरी तट अधिक भक्कम होणार आहे.

Maharashtra Times 26 Nov 2018, 8:56 am
bhavesh.brahmankar@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम radars on coastal territorie
26/11 Attack: सागरी प्रदेशावर रडार वॉच


@BhaveshBMT

नाशिक

भारतीय समुद्र किनारे आणि महासागर यांच्यावर सध्या ४६ रडार वॉच ठेवून आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी ३८ रडार बसविले जाणार आहेत. त्यामुळे एकूण ८४ रडार समुद्री सुरक्षेसाठी सज्ज होणार आहेत. तर, तिसऱ्या टप्प्यात आणखी काही रडार बसविण्यात येणार असल्याने भारतीय सागरी तट अधिक भक्कम होणार आहे.

२६/११ च्या हल्ल्यानंतर देशभरात समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. महाराष्ट्र सरकारपासून केंद्र सरकारपर्यंत सर्वच सतर्क झाले. समुद्र किनाऱ्यांचे संरक्षण कसे करायचे, यासाठी मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले. पंतप्रधानांसह संरक्षण आणि गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठका झाल्या. त्यानंतर या सुरक्षेसाठी सर्वंकष असा कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यातील एक नियोजन होते ते समुद्र किनाऱ्यांलगत रडार यंत्रणा बसविण्याचे. अत्याधुनिक आणि उच्च दर्जाची क्षमता असलेले कॅमेरे बसवून समुद्र किनाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पहिल्या टप्प्यात देशाच्या पश्चिम, पूर्व आणि दक्षिण किनाऱ्यांवर एकूण ४६ रडार बसविण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, या प्रक्रियेला मोठा वेळ लागला. अखेर २०१४-१५ पर्यंत हे सर्व ४६ रडार कार्यन्वित झाले. त्यातील १८ रडार हे पश्चिम किनाऱ्यालगत लावण्यात आले आहेत. त्याचे संपूर्ण नियंत्रण मुंबईतून केले जाते. तर, पूर्व किनाऱ्यावर विशाखापट्टणम, दक्षिण भागातील नियंत्रण कोची तर अंदमानमधील पोर्टब्लेअर येथे नियंत्रण कक्ष आहेत. या चारही नियंत्रण कक्षांचा मुख्य समन्वय हा दिल्ली जवळील गुरगाव येथे साकारण्यात आलेल्या माहिती व्यवस्थापन आणि विश्लेषण केंद्रातून केला जातो. आता दुसऱ्या टप्प्यात देशाच्या समुद्र किनाऱ्यांलगत आणखी ३८ रडार बसविले जाणार आहेत. त्यातील १४ रडार हे पश्चिम किनाऱ्यांवर लागणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील रडार बसविण्यासाठी विविध ठिकाणी भूसंपादन सुरू आहे. येत्या दोन वर्षात हे रडार कार्यन्वित होतील, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

पहिल्या टप्प्यातील ४८ आणि दुसऱ्या टप्प्यातील ३८ असे एकूण ८४ रडार कार्यन्वित होणार आहेत. तर, तिसऱ्या टप्प्यातही आणखी काही ठिकाणी रडार बसविण्याचे नियोजित आहे. त्यामुळे या तिन्ही टप्प्यांचा विचार करता १००हून अधिक रडार भारतीय समुद्र किनाऱ्यांसह भारतीय महासागरावर लक्ष ठेवून राहणार आहेत. २६/११च्या हल्ल्याचा धडा घेऊन भारताने रडारची सक्षम यंत्रणा दिमतीला घेतली आहे. त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला होऊ नये याची मोठी सुरक्षा तयार करण्यात आली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील रडार हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित राहणार असून त्याचा मोठा फायदा सुरक्षा व्यवस्थेवर होणार असल्याचे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

केरळची सज्जता

समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केरळने पुढाकार घेतला आहे. सागरी पोलिसांचे सध्या तेथे ८ पोलिस स्टेशन आहेत. दुसऱ्या टप्प्यात १० आणि तिसऱ्या टप्प्यात ६ असे एकूण २४ पोलिस स्टेशन तेथे कार्यन्वित राहणार आहेत. त्याचा मोठा फायदा तेथील सुरक्षेला होणार असून सागरी क्षेत्रातील विविध गुन्हे तात्काळ नोंदवले जातात. तसेच या गुन्ह्यांचा तपासही जलदगतीने होण्यास चालना मिळणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज