मटा ऑनलाइन वृत्त | मुंबई
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये भाजपशी युती तोडण्याचा शिवसेनेचा सूर दिसून येतो. मात्र, स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी सरकारमधील युती तोडून दाखवावी, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.
शिवसेना स्वाभिमानाचा कितीही आव आणत असली तरी प्रत्यक्षात त्यांना भाजपकडून पदोपदी अपमान सहन करावा लागतो आहे. केवळ सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली असून, लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी युती तोडण्याचे इशारे दिले जात आहेत, अशा शब्दात त्यांनी तोफ डागली.
यंदाच्या पहिल्या ९ महिन्यांत म्हणजे सप्टेंबरअखेरपर्यंत राज्यात २,३२२ शेतकरी आत्महत्या झाल्यासंदर्भातही त्यांनी भाजप-शिवसेना सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, गेल्या वर्षी याच काळात २,२६२ शेतकरी आत्महत्या होत्या. याचाच अर्थ सरकारने केलेल्या घोषणा फोल ठरल्या असून, त्याचा शेतकऱ्यांना पुरेसा फायदा झालेला नाही. त्यामुळेच आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढताना दिसून येत आहेत.
वारंवार मागणी झाल्यानंतही भाजप-शिवसेना सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत असताना त्यांना थेट भरीव आर्थिक मदत दिली नाही. विविध नैसर्गिक संकटांमुळे हातातील पिके गेल्यानंतरही शेतकऱ्यांना पुरेशी नुकसानभरपाई दिली नाही. कसाबसा जो शेतीमाल पिकला, त्याला भाव मिळाला नाही. शासकीय खरेदी केंद्रे सुरू केली नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावाने शेतीमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची अक्षरशः लूट केल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये भाजपशी युती तोडण्याचा शिवसेनेचा सूर दिसून येतो. मात्र, स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी सरकारमधील युती तोडून दाखवावी, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.
शिवसेना स्वाभिमानाचा कितीही आव आणत असली तरी प्रत्यक्षात त्यांना भाजपकडून पदोपदी अपमान सहन करावा लागतो आहे. केवळ सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली असून, लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी युती तोडण्याचे इशारे दिले जात आहेत, अशा शब्दात त्यांनी तोफ डागली.
यंदाच्या पहिल्या ९ महिन्यांत म्हणजे सप्टेंबरअखेरपर्यंत राज्यात २,३२२ शेतकरी आत्महत्या झाल्यासंदर्भातही त्यांनी भाजप-शिवसेना सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, गेल्या वर्षी याच काळात २,२६२ शेतकरी आत्महत्या होत्या. याचाच अर्थ सरकारने केलेल्या घोषणा फोल ठरल्या असून, त्याचा शेतकऱ्यांना पुरेसा फायदा झालेला नाही. त्यामुळेच आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढताना दिसून येत आहेत.
वारंवार मागणी झाल्यानंतही भाजप-शिवसेना सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत असताना त्यांना थेट भरीव आर्थिक मदत दिली नाही. विविध नैसर्गिक संकटांमुळे हातातील पिके गेल्यानंतरही शेतकऱ्यांना पुरेशी नुकसानभरपाई दिली नाही. कसाबसा जो शेतीमाल पिकला, त्याला भाव मिळाला नाही. शासकीय खरेदी केंद्रे सुरू केली नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावाने शेतीमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची अक्षरशः लूट केल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.