अ‍ॅपशहर

‘कपाळावर क्रमांक नोंदणे ही मृतदेहांची विटंबना’

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृत प्रवाशांच्या कपाळावर पोलिसांनी अनुक्रमांक नोंदवणे ही अक्षम्य विटंबना आहे. याप्रकरणी मुंबई पोल‌ीस आयुक्तांना तातडीने निलंबीत करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

Maharashtra Times 30 Sep 2017, 12:23 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम radhakrishna vikhe patil targets mumbai police commissioner
‘कपाळावर क्रमांक नोंदणे ही मृतदेहांची विटंबना’


एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृत प्रवाशांच्या कपाळावर पोलिसांनी अनुक्रमांक नोंदवणे ही अक्षम्य विटंबना आहे. याप्रकरणी मुंबई पोल‌ीस आयुक्तांना तातडीने निलंबीत करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, मुंबई पोलिसांनी केलेला हा प्रकार मानवतेची क्रूर थट्टा आणि असंवेदनशीलतेची परिसीमा आहे. जिवंत अन् मेलेल्या माणसांनाही जनावरासारखी वागणूक देणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा आणि प्रशासनाचा करावा तेवढा निषेध कमीच ठरेल. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी म्हणून मुंबई पोल‌सि आयुक्त व संबंध‌ति दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ही पद्धत योग्य आहे का, यासंदर्भात जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, मृतांच्या हातामध्ये धागा अडकवून त्यावर क्रमांकाची नोंद होते. शिक्का मारण्यामागेही ओळख पटवणे हाच उद्देश असावा, असे सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज