मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाला असेल तर त्यासाठी कार्यप्रणालीचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीही तितकेच जबाबदार आहे, असे सांगत महापालिकेतील घोटाळे झाले असतील तर त्याला जबाबदार कोण, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे, अशी मागणी आज शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका पत्रकार परिषदेत केली.
महापालिकेचे प्रमुख आयुक्त असतात आणि त्यांची नेमणूक मुख्यमंत्री करतात. प्रस्ताव मंजूर करून अंतिम निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीच्यावर आयुक्त आणि नगरविकास विभाग असून या विभागाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात, अशी माहिती शेवाळे यांनी दिली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर सेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र झाला आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेवर केलेल्या प्रत्येक आरोपाचा समाचार घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) सर्वात जास्त कारवाई भाजपच्या नगरसेवकांवर केलेली आहे. राज्य सरकारच्या भाजपच्या ३० खात्यांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार आहे. मुख्यमंत्र्यांच्या गृह खात्यातही पारदर्शकता नाही. त्यामुळे पारदर्शकता हा शब्द त्यांनी पहिल्यांदा बोलायला शिकावा, असा टोलाही राहुल शेवाळेंनी हाणला.
किरीट सोमय्या यांनी टँकर घोटाळ्याचा आरोप केला. मात्र त्यांच्याच मतदासरसंघात शिवाजी नगरमध्ये टँकरने पाणी पुरवण्यासहीत सोमय्या यांच्या सह्यांचे पत्र आहेत. १५० रुपयांचे टँकर्स ७०० ते ८०० रुपयांना विकले गेले, असा आरोप शेवाळे यांनी केला. मुलुंड डंपिंग ग्राऊंडच्या बाजूला आकृती डेव्हलपर्स आणि बिल्डरला फायदा पोहोचवण्यासाठी ते डंपिंग ग्राउंड बंद करण्याची किरीट सोमय्या यांनी मागणी केली. जय श्रॉफ या कंत्राटदारावर किरीट सोमय्या यांनी कचरा घोटाळ्याचा आरोप केला, मात्र याच जय श्रॉफसोबत कोल्ड प्ले कार्यक्रम केला, असे शेवाळे म्हणाले. संजय काकडे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप असून भाजपने त्यांना पक्षात घेतले व राज्यसभेवर पाठवले, असे शेवाळे म्हणाले.
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाला असेल तर त्यासाठी कार्यप्रणालीचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीही तितकेच जबाबदार आहे, असे सांगत महापालिकेतील घोटाळे झाले असतील तर त्याला जबाबदार कोण, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे, अशी मागणी आज शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका पत्रकार परिषदेत केली.
महापालिकेचे प्रमुख आयुक्त असतात आणि त्यांची नेमणूक मुख्यमंत्री करतात. प्रस्ताव मंजूर करून अंतिम निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीच्यावर आयुक्त आणि नगरविकास विभाग असून या विभागाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात, अशी माहिती शेवाळे यांनी दिली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर सेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र झाला आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेवर केलेल्या प्रत्येक आरोपाचा समाचार घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) सर्वात जास्त कारवाई भाजपच्या नगरसेवकांवर केलेली आहे. राज्य सरकारच्या भाजपच्या ३० खात्यांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार आहे. मुख्यमंत्र्यांच्या गृह खात्यातही पारदर्शकता नाही. त्यामुळे पारदर्शकता हा शब्द त्यांनी पहिल्यांदा बोलायला शिकावा, असा टोलाही राहुल शेवाळेंनी हाणला.
किरीट सोमय्या यांनी टँकर घोटाळ्याचा आरोप केला. मात्र त्यांच्याच मतदासरसंघात शिवाजी नगरमध्ये टँकरने पाणी पुरवण्यासहीत सोमय्या यांच्या सह्यांचे पत्र आहेत. १५० रुपयांचे टँकर्स ७०० ते ८०० रुपयांना विकले गेले, असा आरोप शेवाळे यांनी केला. मुलुंड डंपिंग ग्राऊंडच्या बाजूला आकृती डेव्हलपर्स आणि बिल्डरला फायदा पोहोचवण्यासाठी ते डंपिंग ग्राउंड बंद करण्याची किरीट सोमय्या यांनी मागणी केली. जय श्रॉफ या कंत्राटदारावर किरीट सोमय्या यांनी कचरा घोटाळ्याचा आरोप केला, मात्र याच जय श्रॉफसोबत कोल्ड प्ले कार्यक्रम केला, असे शेवाळे म्हणाले. संजय काकडे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप असून भाजपने त्यांना पक्षात घेतले व राज्यसभेवर पाठवले, असे शेवाळे म्हणाले.