मुंबई:
वांद्रे येथे रेल्वे रुळाला तडा गेल्याने पश्चिम रेल्वेवरील धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून जलद मार्गावरची वाहतूक १५ ते २० मिनिटाने उशिराने धावत आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
आज रात्री साडे दहाच्या सुमारास वांद्रे येथे धीम्या मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याने अंधेरीच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे ही वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली असून जलद मार्गावरील वाहतूकही उशिराने धावत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी हा बिघाड दुरुस्त केला आहे. मात्र तरीही आधीच झालेल्या खोळंब्यामुळे लोकल उशिराने धावत आहे. दरम्यान, चाकरमान्यांची घरी जाण्याची घाई असतानाच गर्दीच्यावेळी रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. धीम्या मार्गावरील रेल्वेचा खोळंबा झाल्याने दादर, वांद्रे, अंधेरी आणि इतर महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. जलद लोकललाही गर्दी वाढल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वांद्रे येथे रेल्वे रुळाला तडा गेल्याने पश्चिम रेल्वेवरील धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून जलद मार्गावरची वाहतूक १५ ते २० मिनिटाने उशिराने धावत आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
आज रात्री साडे दहाच्या सुमारास वांद्रे येथे धीम्या मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याने अंधेरीच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे ही वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली असून जलद मार्गावरील वाहतूकही उशिराने धावत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी हा बिघाड दुरुस्त केला आहे. मात्र तरीही आधीच झालेल्या खोळंब्यामुळे लोकल उशिराने धावत आहे. दरम्यान, चाकरमान्यांची घरी जाण्याची घाई असतानाच गर्दीच्यावेळी रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. धीम्या मार्गावरील रेल्वेचा खोळंबा झाल्याने दादर, वांद्रे, अंधेरी आणि इतर महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. जलद लोकललाही गर्दी वाढल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.